Friday 25 May 2012

बाबूमोशाय ....


आई. पी .एल चा चालू असलेला धुडगूस , दोन षटका दरम्यान अगम्य जाहिराती दाखवण्याचा घातलेला घाट , त्यात वाढीव म्हणून पॉवर प्ले चा वैताग हे चालू असताना एका जाहिरातीने कमालीचे लक्ष वेधून घेतले ...काळ्या रंगाचा सूट घातलेला माणूस धीमी पावले टाकत चालत आहे ,ओळखीच्या आवाजात " फेन्स क्या होते हे मुझसे पूछो ..प्यार का वो तुफान मोहोबत कि वो आंधी वो जसबा वो जुनून ...हवा बदल सकती है लेकीन फेन्स ......" असे म्हणत त्याचे आगमन होते आणि काळजाचा ठोका चुकतो ...flash back मध्ये दाखवलेला हाच माणूस आहे का असा प्रश्न पडतो ...अंधारातून एखाद्या व्यक्तीस एकदम उजेडात आणले तर त्याच्या चेहेऱ्यावर जे भाव उमटतील त्याच भावांनी आणि चीर परिचित शब्दांनी " लेकीन फेन्स हमेशा मेरे रहेंगे .." असे म्हणत  काळजाला पुन्हा हात घालतो ....क्षण भर सावरेपर्यंत " बाबूमोशाय ....मेरे फेन्स मुझसे कोई छीन नही सकता ...." असे म्हणून डोळ्यात अश्रुंचे दोन थेंब आणि ओठावर "ये क्या हुवा .....? " या ओळी ठेऊन निघून जातो ...एकेकाळी संपूर्ण जंगलावर राज्य केलेल्या पण आता सत्तांतर झाल्याने   विस्मृतीत गेलेल्या सिंहाने आपले अस्तित्व व सत्ता अजूनही कायम आहे हे पटवून देण्यासाठी सारे बळ एकवटून केलेल्या गर्जनेसारखी हि जाहिरात वाटते .... एका रुबाबी ,राजा आणि स्वप्नातील राजकुमाराचे काळाच्या ओघात काय अधोगती होते याचे प्रत्यंतर हि जाहिरात पाहताना आले ....

Saturday 19 May 2012

चित्रामागचे व्यंग !!


 "..इष्ट आणि स्पष्ट बोलण्याची अगर तशी व्यंगचित्रे काढून दोष दिग्दर्शन करण्याची प्रतिज्ञा करणाऱ्याला आधी इष्टाची ओळख हवी आणि स्पष्टपणाची सीमारेखा कोणती याचे तारतम्य हवे .घाव असा असावा कि ,मरणाराने मरता मरता मारणाराचा हात अभिनंदनासाठी हाती घ्यावा .शेतातले काटे काढताना धान्याची धाटे मोडणार नाहीत याची खबरदारी  घ्यावी  लागते ..व्यंगचित्रकाराला अव्यंगाचे  स्वरूप प्रथम पारखता आले पाहिजे .व्यंगचित्रकाराने प्रथम हसवले पाहिजे .थट्टेमागे आकस आला ,कुचाळी आली कि ते व्यंगचित्र निर्मल पाण्यात रंग न कालवता गटार गंगेच्या  पाण्याने काढल्याची घाण येते .उत्साहाच्या आणि गम्मत करण्याच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या हीनपणावर आवेशाने तुटून पडायच्या भरात आपणा  सर्वांच्या हातून मर्यादेचे उल्लंघन होते ..." व्यंगचित्रात व्यंग राहू नये म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे ते अत्यंत मार्मिकपणे भाई १४ ऑगस्ट १९६३ रोजी ठाकरे बंधूना  लिहिलेल्या पत्रात सांगतात ... पण लोकांच्या मानसिकतेत जर व्यंग असेल  तर सर्व नियम पाळूनही व्यंगचित्रकार कसा बदनाम होतो याचे अनेक लेख सध्या जवळपास सर्वच वृत्तपत्रे छापत आहेत आणि संसदेस ६० वर्षे पूर्ण झाल्याचा बेगडी आनंद अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बळी देऊन साजरा केला जात आहे .... येणाऱ्या भयावह आणि साचेबंद भविष्यकाळाची एक झलक सध्या दाखवली जात आहे ..

Tuesday 15 May 2012

भ्रष्टाचार माझी भूमिका .....



त्यांनी पदर ओढला म्हणून तिने पातळ सोडले खरा प्रकार एवढाच झाला या विंदा यांच्या विरुपिकेमधील एक ओळ खूपच बोलकी आहे " पदर कोठे संपतो आणि पातळ कोठे सुरु होते हे सांगणे कठीण आहे वाऱ्याला विचारा" असेच काहीसे देशात सध्या सुरु आहे ..आचार कोठे संपतो आणि भ्रष्टाचार कोठे सुरु होते हे निश्चितपणे कोणासही सांगता येत नाही एक म्हणतो १२१५ अ १९५० ब १९७५ क्ष तर दुसरा म्हणतो १२५० ब १५५० अ १९५०ज्ञ .... त्यामुळे अशा जटील प्रश्नाची उकल करायची असामान्य कामगिरी वाऱ्यावर सोपवण्यात येते ...शक्तिमान पण अबोल ,वेगवान पण लहरी आणि निष्पाप पण अबोल असा वारा काहीच बोलत नाही म्हणून कोणी म्हणतो ओढ्णारेच गुन्हेगार कोणी म्हणते अरे यार मजा आला तर कोणी म्हणते गुन्हा शोधणारेच गुन्हेगार या सगळ्या गुंत्यात  त्यांनी पदर ओढला का तिने पातळ सोडले ? खरा प्रकार काय झाला हा  विषय वाऱ्यावरच राहतो ...आणि भूमिका न घेतल्यामुळे अखेर  सोडणारे व ओढणारे मोकाट हिंडू लागतात .... या वाऱ्याच्या भूमिकेतच सध्या सामान्य माणूस वावरत आहे ... तो काही बोलतच नाही घेतलेली भूमिका व्यक्त करत नाही आणि व्यक्त केलेल्या भूमिकेवर ठाम राहत नाही त्यामुळेच भ्रष्टाचार आज आपल्या देशाला आतून पोखरत आहे ...या प्रचंड आणि अखंड देशात श्री कृष्णानी सांगितल्या प्रमाणे कोणीतरी महान पुरुष अवतार घेईल आणि या समस्येतून आपली सुटका करेल अशा भाबड्या आशेवर राहून मूकपणे भ्रष्टाचाराला खतपाणी घालून कधी काळी रोपटे असलेल्या भ्रष्टाचाराचा आज इतका मोठा वटवृक्ष झाला आहे की तो संपूर्णपणे उखडून टाकणे श्री ना जमेल का नाही याचीही शंका आहे ...कारण या वृक्षाची मुळे खोलवर रुजलेली असतात आणि पारंब्या जमिनीत रुजल्या की पुन्हा एक वृक्ष तयार होतो आणि अशा वृक्षांची मालिका तयार झाली आणि त्याची भव्यता दृष्टीस पडली की कधी काळी आपल्या बागेत आपल्या सोयी साठी आपणच लावलेल्या वृक्षाची आपल्यालाच भीती वाटू लागते ....

Wednesday 9 May 2012

पोरकट विरोध

तसे कालच अमीर खान आणि त्याचा नवीन शो "सत्यमेव जयते " यावर लिहिल्यावर आज पुन्हा त्याच विषयावर लिहिणे म्हणजे तोच -तोच पणा वाटेल अनेकांना पण आजच्या दिवसात मी जे काही पहिले ,वाचले आणि अनुभवले ते भयंकर होते ... आपण जसे आहोत तसा समाज असला पाहिजे किंवा आपल्या विचारसरणीशी मिळतीजुळती माणसे आपल्या आजूबाजूस असली पाहिजेत अशी अनेक सामान्य लोकांची सामान्य अपेक्षा असते .. लहानपणापासून "आपण चांगले वागले कि समोरचाही चांगला वागतो " अशी शिकवण आपल्याला दिली जाते पण ज्या तत्वांच्या आणि सिद्धांताच्या बुरुजात आपल्या विश्वाचा आणि मुल्यांचा गड सुरक्षित आहे असा आपणास विश्वास असतो तेच बुरुज त्रयस्थपणे परिस्थितीचा विचार केला कि वेगाने ढासळू लागतात आणि आपण आपल्या मुल्यांसह आणि संस्कारासह उघड्यावर पडतो किंवा पडलो आहोत असा समोरच्याचा गैरसमज होतो .. आपल्यासमोर चालू असणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला पटलीच पाहिजे असा अट्टाहास कोणाचाही नसतो ..पण विरोध करतानाही त्याला तत्विक्तेचा आधार हवा हे सत्य अतिरेकी विचाराचा माणूस दरवेळी विसरतो आणि चांडाळ चौकटीमध्ये आपली हवा आणि जगामध्ये आपले हसू करून घेतो ... आज अमीर खान च्या बद्दल प्रतिक्रिया पाहताना ( विविध फेसबुक ग्रौप वरील ) मला असाच अनुभव आला .. मी कोणत्या लोकात वावरत होतो याचा खेद वाटला ....त्यांच्या विरोधाचे मुद्दे असे ....

Tuesday 8 May 2012

सत्यमेव जयते


दिवाळीमध्ये आपण जेव्हा फटाके आणायला बाजारात जातो तेव्हा सर्वात आधी विचारणा होते कि " मोठ्या आवाजाचा बॉम्ब आहे का ?" यामागचे कारण म्हणजे भल्या पहाटे लोक उठायच्या आधी आपण बॉम्ब लाऊन दिवसाची दणकेबाज सुरुवात करण्यात किंवा झोपलेल्या लोकांना उठवण्यात जी मजा आहे ती बाकी कशातही नाही ...किंवा सर्वत्र बॉम्ब उडत असताना माझ्या बॉम्ब चा आवाज सर्वात जास्ती आहे म्हणून माज करण्यातही एक वेगळाच मान आहे ..त्यामुळेच बॉम्ब एकच असूनही विक्रेते त्याचे वेष्टन अधिकाधिक आकर्षित करून त्यास कधी सद्दाम तर कधी लादेन चे नाव देऊन इतर विक्रेत्यांपेक्षा आपले उत्पादन जास्ती विकायचा प्रयत्न मनापासून करतात ... असेच काहीसे "सत्यमेव जयते " या बॉम्ब चे झाले आहे ...बाजारात येण्यापूर्वीची कमालीची प्रसिद्धी ,आमचाच आवाज सर्वात मोठा आहे असा पिटलेला डंका ,अमीर खान चे वलय ,बॉम्ब नक्की कसा फुटणार याबाबत पाळलेली कमालीची गुप्तता ,प्रेक्षकांची ताणून ठेवलेली उत्सुकता , जाहिरातींचा केलेला भडीमार , दिल पे लगेगी तभी तो बात बनेगी अशी ओळ घेऊन तापवलेले रान ,सोशल मिडिया चा अचूक वापर अशा वातावरणात अखेर रविवार दिनांक ८ मे २०१२ रोजी ठीक ११ वाजता फुटला .... दिवसाची दणकेबाज सुरुवात करण्याचा मान , झोपलेल्या लोकांना उठवल्याचे श्रेय आणि सर्वात मोठा आवाज असल्याचा बहुमान त्याने मिळवला .... 

Sunday 6 May 2012

जीवघेणे प्रेम ...

प्रेमामध्ये अजब शक्ती असते असे मानले जाते ...ज्यांनी केले आहे त्यांनी अनुभवले असेल ...ज्यांनी  अजून अनुभवले नाही त्यांनी ऐकले असेल ...आपल्या जोडीदारास त्रास होतो आहे पहिले कि सच्चा प्रेमी कसा पेटून उठतो याचे प्रत्यंतर अनेकांना आलेले असेल ..मुळात प्रेम सोपे नसतेच कधी ...युद्ध आणि प्रेम यात फरक तो काय ? न धड विजयाचा आनंद साजरा करता येत न धड पराभवाचे दुक्ख करता येत कारण जिंकणारी पण आपलीच व्यक्ती आणि हरणारी पण आपलीच ...आधी स्वतःशी युद्ध कि त्याला/तिला विचारू कि नको ....त्यानंतर मन आणि बुद्धी मधील युद्ध हो म्हणू कि नको ... नंतर समाजाच्या नजरांशी युद्ध " वडील किती चांगले आणि हे बघा लफडेबाज "....घरच्यांशी युद्ध " हाच/हीच मिळाली होती का आख्ख्या जगात ?" अधून मधून चालू असणारी जोडप्यातील शीत युद्ध आणि खोटे खोटे ब्रेक अप ...या सर्वातून जात असताना अंगी एक मानसिक आणि शारीरिक कणखरता येते कि या सर्व पातळीवर माझ्यासाठी  लढत असलेल्या जोडीदाराची जबाबदारी माझी आहे ...त्याचे/तिचे समाजापासून संरक्षण करायचे कर्तव्य माझे आहे ... भावनिक खच्चीकरण करणाऱ्या कितीही घटना घडल्या तरी आधार देण्याचे काम माझे आहे आणि कितीही संकटे आली तरी त्याला/तिला पाठीशी घालून त्यांना सामोरे जाण्याचे धैर्य माझ्यात आहे ... कारण कोणाचे तरी माझ्यावर प्रेम आहे ,विश्वास आहे ,आपुलकी आहे ,अपेक्षा आहेत आणि कोणाचेतरी आयुष्य माझ्या आयुष्याशी जोडलेले आहे !! हे सर्व होत असताना विवेक जागृत असणे खूप महत्वाचे असते ... प्रेमाच्या धुंदीत आणि तारुण्याच्या मस्तीत काही अशा चुका होतात कि नंतर पश्चाताप करण्यापलीकडे हाती काही रहात नाही .....

Friday 4 May 2012

वैचारिक कीड

आज वाचनात अनिता पाटील यांचा ब्लॉग आला ...अनिता पाटील हि खरच स्त्री आहे का कोणी स्त्रियांच्या नावामागे लपून अकलेचे तारे तोडत आहे याविषयी मी काही लिहिणार नाही कारण विचारांना लिंग नसते ...विचार हे विचार असतात ...या ब्लॉग मधून सतत आणि कायम ब्राह्मणद्वेष जोपासला ,पसरवला आणि पाळला जातो असे सर्व पोस्त पाहिल्यानंतर सहज लक्षात येते ..अनेकदा फेसबुक वर संचार करत असताना आणि विविध ग्रौप शी संलग्न असताना असे काही कार्यकर्ते दिसून येतात कि त्यांचे विचार आणि मते हे बाधित असतात ..कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या डोक्यापर्यंत जात नाही याचे काय कारण असू शकते याचे प्रत्यंतर सदर ब्लॉग वाचल्यावर येतो.... सर्व धर्म समभाव किंवा जातीभेद टाळा अशा शिकवणी शाळेत आणि घरात दिल्या जात असताना आपल्या मनाची दारे बंद करून घेणे याहून करंटेपणा तो काय ? समाजातील सर्व वाईट गोष्टीना ब्राह्मण जात आणि हिंदू धर्म यांना जबाबदार ठरवून आपली कर्तव्ये नाकारायची आणि सतत दोषारोप करत राहायचे यात कोणती हुशारी ? सध्या समाजसेवक /समाजसुधारक म्हणजे काहीही कार्य न करता हिंदू धर्मावर टीका करत राहणे असा एक कलमी कार्यक्रम राबवला जात आहे त्यामुळे समाजाची सेवाही होत नाही आणि सुधारणाही होत नाही पेरली जातात ती फ़क़्त दुहीची बीजे ....