२६/११ दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याच्या फाशी नंतर देशात (बऱ्याच वर्षांनी ) आनंदाची लाट पसरली .प्रतिक्रिया घेण्यास आणि त्या "सबसे तेज " प्रसारित करण्यात प्रसारमाध्यमांची गडबड सुरु झाली . संबंधित त ज्ञ मंडळी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली सामान्य माणूस मात्र हातचा रिमोट जोरजोरात दाबत कधी हा चेनेल ( वृत्तवाहिनी) तर कधी तो पाहत "एक पाऊल पुढे " राहण्याचा प्रयत्न करत होता . रिमोटला जीव असता तर माणसाच्या उत्सुकतेची किंमत मोजता मोजता तो नक्कीच "शहीद " झाला असता . असो ! पण........ जो कसाब करकरे ,कामटे ,साळसकर यांसारख्या नरवीरांच्या तसेच माझ्यासारख्या अनेक सामान्य माणसांच्या मृत्यूस जबाबदार होता ,त्यास फाशी झाल्यावर मी बोलायचे नाही ? मी नुसते वृत्तपत्र -वाहिन्या पहात माझा वेळ घालवायचा ? माझी मते ,माझा आनंद ,माझा कसाब -पाकिस्तान बद्दलचा राग कोठे बोलायचा ? वृत्तपत्र माझे "जहाल " विचार छापतील का ? अनेक प्रश्न अनेक भावना पण व्यक्त करायच्या कोठे ?? माझे "ठाम " मत सर्वाना कसे सांगायचे ...शे बुवा .... आम आदमी को आम का भाव भी नही मिलता ... :( उदास "फेस " वर अचानक आनंदाचे भाव प्रकटतात ,डोक्यातील राग बोटांकडे वळू लागतो आणि " बोटे चालती फेसबुक ची वाट " ......
सुलभा : पुरुषा राजन सततं प्रियवादिन :! अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ:!!
Friday 23 November 2012
Saturday 17 November 2012
बाळासाहेब ..पुनरागमनाय च !!
Saturday 10 November 2012
एकांत
राजे रजवाडे यांचा काळ लोटून जरी काळ झाला असला त्यांचे आयुष्य मालिका - चित्रपट यातून पाहता येते .. अनेक योजने पसरलेला विस्तीर्ण प्रासादा मधील रुप्या चे छत असलेला महाल , सोन्याच्या सिंहासनावर रुबाबात बसलेला राजा ,समोर चालू असलेले अप्सरांचे कलादर्शन , एका हाती हातभार दूर ठेवलेले खड्ग तर दुसऱ्या हाती कोणत्यातरी पेयाने भरलेला प्याला .... सर्व काही उत्तम सुरु असताना अचानक एक दूत राजाच्या कानात काहीतरी बोलतो ...चेहेऱ्यावर काहीसे चिंतेचे भाव आणून मिशांवर जमा झालेले पेयाचे थेंब आपल्या रेशमी वस्त्राने अलगद पुसतो ...काही क्षण विचार करून " एकांत किंवा तख्लीयत " असे म्हणताच भरलेला सारा महाल काही क्षणात रिकामा होतो आणि शिल्लक राहतो राजा आणि त्याला हवा असलेला एकांत ... !! इतका सुखाचा एकांत आपल्या नशिबात नसला तरी राजाच्या नशिबात असलेला दूत आपल्याही नशिबात आहे .. मग तो व्यक्ती असो व काही प्रसंगाची आठवण , आपले कार्य चोख पार पाडतो !!
विस्तीर्ण पसरलेल्या जंगलाला काही क्षणात भस्मसात करणारा वणवा अधिक धोकादायक कि आग विझल्या नंतर कोणत्यातरी जळक्या ओंडक्या खाली धुगधुगत असलेली एखादी ज्वाला अधिक धोकादायक यावर व्यक्तिपरत्वे मत मतांतरे असू शकतात परंतु माहित असलेल्या चिंता -भय किंवा काळजी ने मनास होणाऱ्या यातनेपेक्षा गतस्मृतींच्या पेटाऱ्यात , मुद्दाम विसरलेल्या काही घटना -आठवणींच्या अस्तित्वाची खूण म्हणून वास करणारी स्मृती हि अधिक धोकादायक असते यावर कदाचित कोणाचेही मतमतांतर असणार नाही !! भावनावेग असो वा शोकाकुल स्थिती काही काळानंतर वेग हा कमी होतोच पण जसे नदीचा पूर ओसरल्यावर मुळ नदीतीरावर त्याच्या खुणा शिल्लक राहतात तश्याच मनावरही असतात .... ना धड वाळलेल्या ना धड वाहत्या ! अचानक बहुत प्रयत्नाने घातलेले कच्चे टाके उसवतात आणि अनामिक निराशेने आयुष्य व्यापून जाते ... नक्की कोणत्या आठवणीने आपण अस्वस्थ आहोत हे हुडकण्यासाठी सर्व गतस्मृतींची पुन्हा उजळणी होते आणि रोग बरा पण इलाज नको अशा निष्कर्षाप्रत आपण येऊन पोहोचतो ...असेच काहीसे माझ्या बाबतीत झाले ...
Subscribe to:
Posts (Atom)