"ठेविले अनंत तैसेचि राहावे चित्ती असावे समाधान " अशी मनोवृत्ती बाळगणाऱ्या , "शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात " अशी प्रार्थना करत आयुष्य (व्यर्थ ) घालवणाऱ्या परंपरेचे पालन करणाऱ्या , " राजकारण म्हणजे गटार किंवा चिखल त्यात उतरू नकोस हं " अशी शिकवण होणाऱ्या अपत्यास गर्भसंस्कारातून देणाऱ्या , पोलिओ डोस च्या आधी " कोणाच्या अध्यात मध्यात जायचं नाही " असा डोस देणाऱ्या , "सत्यमेव जयते " हे जरी देशाचे ब्रीदवाक्य असले तरी हे कलियुग आहे ..येथे असत्याचाच विजय होतो नसती हिरोगिरी करायची गरज नाही असे (मिथ्या ) बाळकडू गेली ६० वर्षे आपल्या मुला मुलीना पाजणाऱ्या वडिलांच्या विर्यातून कोणते गुण संक्रमित होणार ?? याच निराश आणि निराशावादी मानसिकतेने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या ६ पिढ्या निद्रिस्त झाल्या होत्या .. गोरे गेले आणि काळे आले या आनंदात आकंठ बुडालेले , आपल्या आणि आपल्या पूर्वजांच्या कर्तुत्वाच्या कथांचे कथाकथन करण्यात मश्गुल झालेले , लोकशाही पासून ठराविक अंतर राखून असलेले , विरोध करायच्या मुलभूत हक्कालाही विरोध करणारे , घराण्याला सलाम करणारे आणि आमच्या वेळी असे नवते म्हणून उसासे टाकणारे ..... इंडिया आणि भारत दोन्हीतही राहणारे "भारतीय " .... अर्थात कुसुमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे " काळोखाचा सागर कितीही अथांग असला तरी त्यात प्रकाशाची बेटे असतातच " त्याच बेटांवर जन्म झालेली , स्वतंत्र विचारात वाढलेली , बदल हा तुझ्यापासून होतो या संस्कारात वाढलेली , न्याय आणि अन्याय याच्या परिभाषा स्पष्ट असलेली , कैक वर्षे बसलेला "बेजबाबदारपणाचा " शिक्का फ्लश करून सरकारला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यास एकत्र येणारी , अहिंसा परमो धर्मः मानत रंग दे बसंती स्टाइल मेणबत्ती मोर्चा काढणारी आणि बदल्यात लाठी ,अश्रुधूर यांसारखी दडपशाही सहन करूनही आपल्या हक्कांसाठी लढणारी एक नवी पिढी अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर दिल्ली सामुहिक बलात्कार घटने नंतर माझ्या पिढीला पाहायला मिळाली ..... ( जे .पी . आंदोलन केवळ श्रुत आहे अनुभूत नाही )
मला अजूनही आठवते २००३ साल ...आणि सांगली जिल्हा नगरवाचनालय यांनी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील " आम्ही विद्यार्थी बेजबाबदार आहोत का ? " या विषयावर केलेले भाषण .... मी इयत्ता सातवीत असताना म्हणालो होतो " विद्यार्थ्यांचा विद्यापीठावर मोर्चा ,कुलगुरुना घेरावो आणि अशा बातम्या वाचून वडीलधारी मंडळी कुरकुरतात " आजचे विद्यार्थी बेशिस्थ आणि बेजबाबदार झाले आहेत " पण कोणी असा विचार का करत नाही की विद्यार्थी शिस्त का मोडतात ? त्याला काही अंशी मोठी आणि जबाबदार जबाबदार नाहीत का ?? " माझेच विचार १० वर्षांनी वाचून मला खेद वाटतो .... पारितोषिक मिळाल्याचा आनंदा पेक्षा एक दशक होऊनही परिस्थिती तशीच आहे याचा खेद वाटतो ! विद्यार्थी किंवा तरुण (विधायक ) कार्यासाठी शिस्त मोडतो कारण जबाबदार माणसे जबाबदारपणे वागत नाहीत . आंदोलनात सहभागी झालेल्या किती जणांना कायदा ,संविधान माहित असते ? कायदे काय आहेत आणि आपण कोणत्या कायद्याची मागणी करत आहोत याची जाण असते ? भावनेपेक्षा नियमाना महत्व द्यायची मानसिकता आणि वैचारिक झेप किती जणांची असते ? फार मोजक्या ... मग ,आर्थिक ,शैक्षणिक ,सामाजिक ,धार्मिक ,भाषिक ,तात्विक मर्यादा झुगारून असे काय असते कि जे भारत आणि इंडिया ला एकत्र आणते ?? " बदल " ...... नको आहे आताच्या पिढीला निराशा आणि निराशवादी पूर्वजांच्या विर्याचा अंश .... नको आहे ती , नको आहे "चालता है " मानसिकता त्यांना हवा आहे तो बदल ... स्वतःला ,समाजाला आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना अभिमान वाटेल असा बदल. नाही म्हणणार येणाऱ्या पिढ्या " भारत कधी कधी माझा देश आहे "...राजकारण हि अजूनही गटार आहे पण आता घाणीची पर्वा न करता चिखलात उतरून सफाई करण्याची जिद्द आजच्या तरुणाईत आहे , देशाच्या राजकारणाची आणि समाजकारणाची गणिते झपाट्याने बदलत आहेत ... "बदलाचे " वारे जोमाने वाहत आहे , तरुणाई आता ""पर्याय " शोधत आहे आणि याच घटनांचा परिपाक दिसून आला तो जंतर मंतर वर ...
बेजबाबदार आणि संकुचित तरुणाई हा जेष्ठांचा दृष्टीकोन मोडीत काढत ,तरुणाई जंतर मंतर वर एकवटली पर्यायाचा शोध घेत आणि बदलाची अपेक्षा ठेऊन ... अण्णांचे आंदोलन अपयशी ठरल्या नंतर निराश झालेले बदल प्रेमी दिल्ली बलात्कारा नंतर पुन्हा एकवटले ... आपल्यातीलच एकीच्या न्यायासाठी ,तिच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात , सरकारच्या उदासीनतेच्या विरोधात , कायद्याच्या चौकटीत सद्य कायद्यांच्या विरोधात आणि झालेल्या घटनेच्या निषेधात . एका हाती घोषणा फलक आणि एका हाती मेणबत्ती घेऊन निदर्शने होऊ घातलेल्या बदलाचे शिल्पकार पाहून मला वाटले कि मी नशीबवान आहे कि बदल माझ्या डोळ्याने पहात आहे , एकीच्या अभावाने तैमुरापासून आताच्या घराणेशाही (मी सेनेचा कार्यकर्ता नाही ) पर्यंत ज्यांनी आपल्यावर राज्य केले तीच एकी आता होत आहे , मी नशीबवान आहे कारण या गर्दीला ,धर्माचा जातीचा ,भाषेचा विद्रूप चेहेरा नाही , मी नशीबवान आहे कारण यातील कोणालाही समाजकारणाची नाटके करून आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करायची सुप्त इच्छा नाही , मी नशीबवान आहे कारण "मेणबत्ती संस्कृतीला " विरोध करणारे लेख किंवा विचार वाचून .ऐकून यांचा निर्धार डळमळत नाही , मी नशीबवान आहे कि आता "कार्यकर्त्यांचे " "विरोधकांचे " मानसिक आणि बौद्धिक वय वाढले आहे , मी नशीबवान आहे कारण आता निदर्शने केवळ "तो /ती " सांगतो म्हणून होत नाहीत तर मला एखादी गोष्ट पटत नाही किंवा एखाद्या गोष्टीस माझा विरोध आहे म्हणून होतात , मी नशीबवान आहे कारण सत्तेचे आणि लाभाचे गाजर दाखवून माझे आंदोलन कोणी दडपू शकत नाही , मी नशीबवान आहे कि माझ्या एकीला आता new politics असे नाव मिळाले आहे आणि देशातील प्रत्येक राजकीय पक्ष , राजकीय विश्लेषक माझा विचार करत आहे आणि माझी शक्ती मान्य करत आहे ...मी लोकशाहीच्या विरोधात नाही ,मला समर्थन आहे म्हणून संसदेवर हुकुमशाही करायची माझी इच्छा नाही ...येथे मी म्हणजे तो प्रत्येक माणूस जो आंदोलनात सहभागी झाला होता .....पण मला एक खंत आहे .... माझ्या मेणबत्ती मशाल झालीच नाही ...
तिच्यासाठी आणि तीचासारख्या अनेक होऊ नयेत म्हणून आम्ही एकतर ,आलो निदर्शने .केली ,अहिंसेचा पुरस्कार अंतरराष्ट्रीय स्तरावर करणाऱ्या सरकारची देशांतर्गत अहिंसा अनुभवली जे शक्य होते हे सर्व केले पण मेणबत्ती ची मशाल झालीच नाही . आंदोलन करतानाचे फोटो २-१ वृत्तपत्रात छापून आले पण मला जो संदेश द्यायचा होता त्याचे काय झाले ? २६/११ ला आम्ही मेणबत्ती घेऊन जातो पण सरकारला त्याचे काहीच वाटत नाही तसेच आताही होईल का ?? आता घटनेला एक महिना झाला माध्यमांचा विषयातील रस संपला आणि कार्यकर्त्यांची गर्दीही ... वेळ साधून वेळ मारायची राजकीय लोकांची कार्ताब्गारीही संपली आणि वेळेचे तारतम्य विसरून वाचाळपणा करणाऱ्या वाचाळवीरांची जीभही आता थंडावली ....इतके सारे होऊनही मी पेटवलेल्या मेणबत्तीची मशाल झालीच नाही . मी का पेटवतो मेणबत्ती ?? निराशेने ,वेदनेने ,अनिश्चिततेने , अन्यायाने व्यापलेल्या ,अंधारून आलेल्या वातावरणात आशेची तिरीप देण्यासाठी ..अंधाऱ्या वाटेत माझ्या मागून येणाऱ्या काही लोकांना रस्ता दाखवण्यासाठी , मी पुढे जात असताना स्वार्थाच्या ,लालसेच्या ,सत्तेच्या आणि अहंकाराच्या खड्ड्यात पडून कूपमंडूक न होण्यासाठी आणि माझ्यातील स्वत्वाचा ,भावनांचा ,संवेदनांचा शोध घेण्यासाठी ..... पण हि मेणबत्ती केवळ माझ्याच हातात आणि मनात पेटून काय उपयोग ?? ती लोकशाही च्या चारही स्तंभात " सदैव " पेटली पाहिजे .... पण तसे होत नाही म्हणूनच कोणतीही निंद्य घटना घडली कि मेणबत्त्या अनेक पेटतात पण त्यांच्या मशाली होतच नाहीत ...
मला अजूनही आठवते २००३ साल ...आणि सांगली जिल्हा नगरवाचनालय यांनी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील " आम्ही विद्यार्थी बेजबाबदार आहोत का ? " या विषयावर केलेले भाषण .... मी इयत्ता सातवीत असताना म्हणालो होतो " विद्यार्थ्यांचा विद्यापीठावर मोर्चा ,कुलगुरुना घेरावो आणि अशा बातम्या वाचून वडीलधारी मंडळी कुरकुरतात " आजचे विद्यार्थी बेशिस्थ आणि बेजबाबदार झाले आहेत " पण कोणी असा विचार का करत नाही की विद्यार्थी शिस्त का मोडतात ? त्याला काही अंशी मोठी आणि जबाबदार जबाबदार नाहीत का ?? " माझेच विचार १० वर्षांनी वाचून मला खेद वाटतो .... पारितोषिक मिळाल्याचा आनंदा पेक्षा एक दशक होऊनही परिस्थिती तशीच आहे याचा खेद वाटतो ! विद्यार्थी किंवा तरुण (विधायक ) कार्यासाठी शिस्त मोडतो कारण जबाबदार माणसे जबाबदारपणे वागत नाहीत . आंदोलनात सहभागी झालेल्या किती जणांना कायदा ,संविधान माहित असते ? कायदे काय आहेत आणि आपण कोणत्या कायद्याची मागणी करत आहोत याची जाण असते ? भावनेपेक्षा नियमाना महत्व द्यायची मानसिकता आणि वैचारिक झेप किती जणांची असते ? फार मोजक्या ... मग ,आर्थिक ,शैक्षणिक ,सामाजिक ,धार्मिक ,भाषिक ,तात्विक मर्यादा झुगारून असे काय असते कि जे भारत आणि इंडिया ला एकत्र आणते ?? " बदल " ...... नको आहे आताच्या पिढीला निराशा आणि निराशवादी पूर्वजांच्या विर्याचा अंश .... नको आहे ती , नको आहे "चालता है " मानसिकता त्यांना हवा आहे तो बदल ... स्वतःला ,समाजाला आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना अभिमान वाटेल असा बदल. नाही म्हणणार येणाऱ्या पिढ्या " भारत कधी कधी माझा देश आहे "...राजकारण हि अजूनही गटार आहे पण आता घाणीची पर्वा न करता चिखलात उतरून सफाई करण्याची जिद्द आजच्या तरुणाईत आहे , देशाच्या राजकारणाची आणि समाजकारणाची गणिते झपाट्याने बदलत आहेत ... "बदलाचे " वारे जोमाने वाहत आहे , तरुणाई आता ""पर्याय " शोधत आहे आणि याच घटनांचा परिपाक दिसून आला तो जंतर मंतर वर ...
बेजबाबदार आणि संकुचित तरुणाई हा जेष्ठांचा दृष्टीकोन मोडीत काढत ,तरुणाई जंतर मंतर वर एकवटली पर्यायाचा शोध घेत आणि बदलाची अपेक्षा ठेऊन ... अण्णांचे आंदोलन अपयशी ठरल्या नंतर निराश झालेले बदल प्रेमी दिल्ली बलात्कारा नंतर पुन्हा एकवटले ... आपल्यातीलच एकीच्या न्यायासाठी ,तिच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात , सरकारच्या उदासीनतेच्या विरोधात , कायद्याच्या चौकटीत सद्य कायद्यांच्या विरोधात आणि झालेल्या घटनेच्या निषेधात . एका हाती घोषणा फलक आणि एका हाती मेणबत्ती घेऊन निदर्शने होऊ घातलेल्या बदलाचे शिल्पकार पाहून मला वाटले कि मी नशीबवान आहे कि बदल माझ्या डोळ्याने पहात आहे , एकीच्या अभावाने तैमुरापासून आताच्या घराणेशाही (मी सेनेचा कार्यकर्ता नाही ) पर्यंत ज्यांनी आपल्यावर राज्य केले तीच एकी आता होत आहे , मी नशीबवान आहे कारण या गर्दीला ,धर्माचा जातीचा ,भाषेचा विद्रूप चेहेरा नाही , मी नशीबवान आहे कारण यातील कोणालाही समाजकारणाची नाटके करून आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करायची सुप्त इच्छा नाही , मी नशीबवान आहे कारण "मेणबत्ती संस्कृतीला " विरोध करणारे लेख किंवा विचार वाचून .ऐकून यांचा निर्धार डळमळत नाही , मी नशीबवान आहे कि आता "कार्यकर्त्यांचे " "विरोधकांचे " मानसिक आणि बौद्धिक वय वाढले आहे , मी नशीबवान आहे कारण आता निदर्शने केवळ "तो /ती " सांगतो म्हणून होत नाहीत तर मला एखादी गोष्ट पटत नाही किंवा एखाद्या गोष्टीस माझा विरोध आहे म्हणून होतात , मी नशीबवान आहे कारण सत्तेचे आणि लाभाचे गाजर दाखवून माझे आंदोलन कोणी दडपू शकत नाही , मी नशीबवान आहे कि माझ्या एकीला आता new politics असे नाव मिळाले आहे आणि देशातील प्रत्येक राजकीय पक्ष , राजकीय विश्लेषक माझा विचार करत आहे आणि माझी शक्ती मान्य करत आहे ...मी लोकशाहीच्या विरोधात नाही ,मला समर्थन आहे म्हणून संसदेवर हुकुमशाही करायची माझी इच्छा नाही ...येथे मी म्हणजे तो प्रत्येक माणूस जो आंदोलनात सहभागी झाला होता .....पण मला एक खंत आहे .... माझ्या मेणबत्ती मशाल झालीच नाही ...
तिच्यासाठी आणि तीचासारख्या अनेक होऊ नयेत म्हणून आम्ही एकतर ,आलो निदर्शने .केली ,अहिंसेचा पुरस्कार अंतरराष्ट्रीय स्तरावर करणाऱ्या सरकारची देशांतर्गत अहिंसा अनुभवली जे शक्य होते हे सर्व केले पण मेणबत्ती ची मशाल झालीच नाही . आंदोलन करतानाचे फोटो २-१ वृत्तपत्रात छापून आले पण मला जो संदेश द्यायचा होता त्याचे काय झाले ? २६/११ ला आम्ही मेणबत्ती घेऊन जातो पण सरकारला त्याचे काहीच वाटत नाही तसेच आताही होईल का ?? आता घटनेला एक महिना झाला माध्यमांचा विषयातील रस संपला आणि कार्यकर्त्यांची गर्दीही ... वेळ साधून वेळ मारायची राजकीय लोकांची कार्ताब्गारीही संपली आणि वेळेचे तारतम्य विसरून वाचाळपणा करणाऱ्या वाचाळवीरांची जीभही आता थंडावली ....इतके सारे होऊनही मी पेटवलेल्या मेणबत्तीची मशाल झालीच नाही . मी का पेटवतो मेणबत्ती ?? निराशेने ,वेदनेने ,अनिश्चिततेने , अन्यायाने व्यापलेल्या ,अंधारून आलेल्या वातावरणात आशेची तिरीप देण्यासाठी ..अंधाऱ्या वाटेत माझ्या मागून येणाऱ्या काही लोकांना रस्ता दाखवण्यासाठी , मी पुढे जात असताना स्वार्थाच्या ,लालसेच्या ,सत्तेच्या आणि अहंकाराच्या खड्ड्यात पडून कूपमंडूक न होण्यासाठी आणि माझ्यातील स्वत्वाचा ,भावनांचा ,संवेदनांचा शोध घेण्यासाठी ..... पण हि मेणबत्ती केवळ माझ्याच हातात आणि मनात पेटून काय उपयोग ?? ती लोकशाही च्या चारही स्तंभात " सदैव " पेटली पाहिजे .... पण तसे होत नाही म्हणूनच कोणतीही निंद्य घटना घडली कि मेणबत्त्या अनेक पेटतात पण त्यांच्या मशाली होतच नाहीत ...
No comments:
Post a Comment