Saturday 31 March 2012

बिगुल वाजला ..

1976 मध्ये मेहमूद च्या आवाजातील " ना बीबी ना बच्चा ना बाप बडा ना मैया the whole thing is that के भैया सबसे बडा रुपैया...खाली हात अगर तू मर गया मेरी जान ना अग्नी तुझको छुयेगी ना धरती देगी मान.... "अशा वास्तवदर्शी आशयाचे एक गाणे येऊन गेले होते .... काही प्रसंग असे असतात कि त्यावेळी अशा जुन्या आणि अर्थपूर्ण गाण्यांची हमखास आठवण येते .. आणि बुजुर्ग "गीतकारांच्या जाणतेपणाचे" आश्चर्ययुक्त कौतुक वाटते ... सध्या आई.पी .एल .५ च्या जाहिराती पाहत असताना कळत न कळत हे गाणे सारखे ओठावर येते आणि डोळ्यासमोर येते ती गावातील जत्रा आणि कोंबड्यांच्या झुंझी...ज्यात दोन पैसेवाले मालक आपल्या मनोरंजनासाठी आणि वर्चस्वाच्या लढाईसाठी आपल्याकडील सर्वोत्तम कोंबडे मैदानात उतरवतात ..मैदानाच्या कोपऱ्यात मदनिकांच्या सहवासात आणि मद्याच्या घुटक्यात झुन्झीचा थरार पाहून आनंद घेतात ..कोंबडे सुद्धा जीवाच्या आकांताने मालकासाठी आणि मालकाच्या पैशा साठी लढत असतात कारण त्यांना ठाऊक असते कि जिंकलो तर डोक्यावर आणि हरलो तर चुलीवर .... ! जग हे असेच चालत असते ... पैसे वाल्यांनी आपल्या करमणुकीसाठी पैसे ओतून एखादा खेळ निर्माण करावा आणि सर्व सामान्य लोकांकडून ओतलेल्या पैशाच्या अनेकपट पैसा वसूल करावा हे सर्व   चालत असताना नियामक मंडळाने मात्र केवळ दलालाची भूमिका बजावावी  आणि खेळाचा खेळ खंडोबा करून टाकावा .......

Wednesday 28 March 2012

सुटलेला संयम...... !

 एका भल्या मोठ्या देशावर एक राणी राज्य करत असते ....कमी होत असलेला पैसा ,वाढत चाललेली महागाई ,वाढत असलेली गरिबी ,वाढत असलेला भ्रष्टाचार ,राणीच्या मंत्री मंडळातील सदस्यांचे घोटाळे , देशातून विदेशात वाहणारी काळ्या पैशाची गटार आणि सामान्य माणसास दिवसास ३० रुपये पुरतात ,म्हणून राणीने केलेली थट्टा, राणीच्या कारभारातील शिपाई ,हवालदार ,कोतवाल ,पट्टेवाले ,चोपदार यांच्याही कोट्यावधी च्या उड्या या सर्वाने त्रासलेला एक वृद्ध या भ्रष्ट कारभाराचा अभ्यास करतो , जनतेचे प्रश्न -समस्या एका कायद्यात मांडून तो कायदा डोक्यावर घेऊन देशाटन करत राहतो ....वाटेत लोक त्या कायद्याला पाहून ,आपल्या समस्या हा मांडणार आणि आपली सुटका करणार या आशेने त्याला नमस्कार करू लागतात , त्याच्याबरोबर सामील होतात ,आता सरकार आणि सरकारी लोकांची मानसिकता बदलणार अशी भाबडी अशा ठेवायला लागतात पण हा लोकांचा प्रतिसाद पाहून त्या व्यक्तीला वाटू लागते कि लोक मलाच नमस्कार करत आहेत ,कायद्यापेक्षा ,देशापेक्षा ,देशाच्या नियमांपेक्षा मी मोठा आहे ...सार्वभौम आहे ! याचा उन्माद येऊन बेताल वक्तव्ये करू लागतो आणि नेताच असे वागतो म्हणून कार्यकर्ते पण फुकाचे अवसान आणून त्याची री ओढू लागतात आणि या बोल बच्चन पणात जनतेच्या पदरी मात्र पुन्हा भोपळा येतो ......

Sunday 25 March 2012

ज्योती चौधरी .....अखेर न्यायाची ज्योत पेटली !

नियती ! सामान्य वाटणारे शब्द पण असामान्य कार्य करणारे ...आयुष्याला व्यापून टाकणारे ...सत आणि असत यातील भेद दूर करणारे , प्रज्ञापराध करायला भाग पाडणारे, सत सत विवेकबुद्धी भ्रमिष्ट करणारे , संवेदनांना बोथट करणारे ,सुखाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचवून दुक्खाच्या खाईत लोटणारे , यशाच्या सीमा ओलांडून अपयशाच्या परिसीमा दाखवणारे ... ३ शब्द ! सतत आपल्या आसपास वावरणारी  , आपले सुख ,आनंद  ,यश याकडे पाहून खिन्नपणे हसणारी आणि आयुष्यात प्रवेश करण्याची एक संधी कायम हुडकत असणारी नियती .... होत्याचे न्हवते आणि न्हवत्याचे होते करणारी नियती ...आणि नियतीसमोर अगतिक असणारा सर्वशक्तिमान माणूस !!
           

Friday 23 March 2012

व्यर्थ गेले का बलिदान ?

आयुष्य किती जगले यापेक्षा ते कसे जगले यास अनन्य साधारण महत्व आहे .... लाचारीने प्राणांची भिक मागून आणि आयुष्याला सुद्धा आयुष्याचा कंटाळा येई पर्यंत जगणे यात काय तो मोठेपणा ? स्वताच्या देशासाठी , स्वातंत्र्यासाठी , ध्येयासाठी आपल्या सर्वस्वाचा आणि आयुष्याचा सुद्धा त्याग करणे यात खरे मोठेपण .... भारताच्या स्वातंत्र्यासाठी कोवळ्या वयात स्वताच्या प्रांणांची आहुती देणाऱ्या भगतसिंग ,राजगुरू आणि सुखदेव यांची आज " दुर्लक्षित " जयंती ..... कारण स्वतंत्र भारतात ज्या लोकांच्या पश्चात जयंती साजरी करण्याचे भाग्य  मिळते त्या यादीत  या ३ नावाना किंवा कोणत्याही "जहाल " मतवादी नेत्यास स्थान नाही .... अहिंसा आणि उपोषणाने षंढ केलेल्या समाजास "सशस्त्र क्रांतीचे " झणझणीत अंजन सोसेल कसे ? मतांचे राजकारण होत नसल्याने सरकारला त्यांचे महत्व समजेल कसे ? २ गल्लीच्या दादाची पोस्टरे लाऊन गाव घाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना या वीर पुरुषांची पोस्टरे लावायची समज येणार कसे ? १/२ नग्न नट्यांचे पूर्ण पान फोटो छापणाऱ्या वृत्तपत्रास यांचा फोटो छापायला सांगणार कोण ? अरे का केले यांनी बलिदान ? का स्वातंत्र्याच्या धगधगत्या कुंडात आपले देह हसतमुखाने झोकून दिले ? व्यर्थ गेले का बलिदान . ?
           

               नाही बोलणार त्यांच्या कार्या विषयी , नाही उलगडणार त्यांचा जीवनपट , नाही मांडणार त्यांची मते , नाही सांगणार त्यांचे महत्व कारण आम्हाला जाणूनच घ्यायचे नाही ....आमची तशी इच्छाच नाही ....कारण भारतास ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्या यादीत यांना मनाचे स्थानच नाही ... आम्ही रमतो ते चेश्मे गोळा करण्यात आणि पत्रे सांभाळण्यात ....काही लोकांच्या वंशजांची चापलुसी करण्यात आम्ही धन्यता मानणार .... मिळाले स्वातंत्र्य मिळाले पण स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार मात्र दुर्लक्षितच राहिले ..आजही एक मोठा  तरुण वर्ग यांच्या पासून प्रेरणा घेतोय , यांना आदर्श मानतोय ,यांचे जीवन समजून घेतोय ...त्यामुळे सरकारने कितीही " काँग्रेसी " पणा केला तरी यांचे कर्तुत्व झाकून ठेवता येणार नाही ...... तात्या म्हणतातच " मुलामुलींची वीण वाढवणे आणि चार काटक्या जमवून घरटी बांधणे याला का संसार म्हणायचे ? असला संसार चिमण्या आणि कावळेसुद्धा करतात ....हजारो जणांच्या घरातून सोन्याचा धूर निघावा म्हणून स्वताची चार चूल बोळकी फोडून टाकणे याचे नाव संसार " तर अशा संसार करणाऱ्या महान त्यागी त्रीमुर्तीना सलाम !!

समृद्धीचा आणि मांगल्याचा... गुढी पाडवा !!


चैत्र शुद्ध  प्रतिपदा ... गुढी पाडवा !! मराठी मनाचा ....मानाचा आणि अस्मितेचा दिवस  ! साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त ! हिंदू रीतीनुसार  प्रारंभ.... नव्या भविष्याचा ...नव्या क्षितिजांचा ... नव्या वर्षाचा ! आयुष्यात आलेली आणखी एक संधी .... भूतकाळाच्या कटू गोड आठवणी भूतकाळातच ठेऊन त्यातून आलेला अनुभव वर्तमानात घेऊन येणे आणि वर्तमानातील कर्म आणि भूतकाळातील अनुभव यांच्या शिदोरीने भविष्य उज्वल बनवायची एक संधी ... ! एक मुहूर्त ..... आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायचा ! एक दिवस ..... विजय साजरा करायचा , शुभ कामनांची देवाण घेवाण करायचा आणि पुन्हा संस्कृती जवळ जायचा ! एक सकाळ ..... आकाशात उंच गुढी  उभारायची ... उगवत्या सूर्याची किरणे गढू वरून परावर्तीत होताना पहायची ....उभारलेल्या गुढीकडे अभिमानाने पहायची ! एक दुपार ... पुरण पोळी ,तूप ,कटाची आमटी, ३ प्रकारचे भात आणि साग्रसंगीत स्वयंपाक खायची आणि समाधानाने "अन्नदाता सुखी भव " म्हणायची !  एक सायंकाळ ...... उंच उभारलेल्या गुढीस खाली उतरवायची ...आणि वर गेलेले कधीतरी खाली येणारच हा संस्कार मनी रुजवायची , आप्तेष्टांना भेटून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायची आणि नवीन वर्षाची काहीतरी खरेदी करायची !! आणि एक रात्र ....दिवसभर जसे वागलो ,जे संकल्प केले ...कळत न कळत जे संस्कार झाले ते टिकवायची आस मनात धरून सूर्योदयाची वाट पाहणारी

Thursday 22 March 2012

गोष्ट छोटी डोंगरा एवढी !!



हाताचे बळ जवळ असताना निराश कधी व्हायचे नसते
गत दुक्खांची उजळणी करत  हताश कधी व्हायचे नसते
यश पदरात पडत नाही म्हणून कधी रडायचे नसते
नव्या जोमाने सुरुवात करून जीवनाची दशा बदलायची असते
हाताचा पसा दुसऱ्यासमोर धरून लाचारी कधी स्वीकारायची नसते
संकटांची तमा न बाळगता त्यावर मात करायची असते .....!!  

    असे म्हणत सतत पुढे जाणारा शेतकरी ! मुळात पांढरा पण निळीच्या सढळ वापराने निळसर झालेला आणि त्यालाही मातकट रंगाची किनार असलेला सदरा , त्याच्या आत काहीही सामान माऊ शकेल असा  कप्पा असणारी बंडी,खाली ठिगळ लावलेले धोतर, किंवा आताच्या मुलांच्या दोन प्यांता  होतील इतके कापड वापरलेली विजार ,गळ्यात एखादी तुळशी माळ  आणि कपाळावर गंध किंवा बुक्क्याचा टिळा, डोईवर मुंडासे /पटके किंवा गुंडाळलेला टॉवेल, एका हाती खुरपे तर दुसर्या हाती बैलगाडीचे दावे आणि सोबतीला चंची ....अनंत चिंता ,समस्या असूनही शेतावर मनापासून प्रेम करणारा , मातीने लिंपलेल्या  आणि शेणाने सारवलेल्या घरात समाधानाने राहणारा , २४ तासातले १८ तास वीज नसूनही शेती फुलवणारा,वाढवणारा आणि जगवणारा ,रानात गेलो तर २-४ कांसे मातेच्या ममतेने खायला घालणारा आमचा शेतकरी !! आताच्या ३० मजल्याच्या इमारतीत २८ मजल्यावर राहणाऱ्या ,विदेशी उंची कडपे मूळ रंगतच वापरणाऱ्या ,बेल्जियम कार्पेट वर चकचकीत बुटांसह फिरणाऱ्या ,२४ तासापैकी २४ तास ए.सी मध्ये बसणाऱ्या  ,फर्डे इंग्लिश फाडणार्या, शेतकर्याचे वार्षिक उत्पन्न महिन्यात मिळवणाऱ्या , शेतकरी जसा कामासाठी तालुक्यात किंवा जिल्ह्यात येतो तसे उठसुठ विदेशवारी करणाऱ्या "प्रगत " लोकांच्या भाषेत "गावठी / गावाकडचे लोक "

Saturday 17 March 2012

महान खेळाडूचे....महाशतक !!


दिनांक १६/०३/२०१२ ..... वेळ सकाळची ....चर्चेचे विषय २.... पहिला अर्थसंकल्पाचा आणि दुसरा सचिन च्या महाशतकाचा  ! दोन्हीही विषय तितकेच महत्वाचे आणि मनाच्या जवळचे .... सवई प्रमाणे कॉंग्रेस ने २ हातानी दिले आणि ४ हातानी काढून घेतले ...या दुक्खात भारतीय जनसागर असताना १.३० मिनिटांनी सचिन रमेश तेंडूलकर याचे मिरपूर मैदानाच्या २२ यार्ड खेळपट्टीवर आगमन झाले ... आश्वासक सुरुवात करताना ४ खणखणीत चौकार मारून आशेचा किरण दाखवला .....आणि बघता बघता शतकांचे महाशतक करून कॉंग्रेस सरकार ला "फुल्या फुल्या " वाहणाऱ्या लोकांना स्वतावर " स्तुतीची फुले " वाहायला भाग पाडले... या "सोनियाच्या " दिनाचे अप्रूप सचिन पेक्षा सोनियाला जास्ती असणार ...प्रणव दादांनी निराशा केल्यानंतर ...बाबा राहुल कोठल्या तरी कोपऱ्यात दिग्गी गुरुजी सोबत पंतप्रधान - पंतप्रधान खेळत असताना ... विरोधी पक्ष योर्कर वर योर्कर टाकत असताना पोराला आवरायचे का पक्षाला सावरायचे या द्विधा मनस्थिती मध्ये असणाऱ्या बाईंचे काम सचिन ने हलके केले .....सचिन तेंडूलकर परंपरेत न बसणारे पण सगळ्या जगाला उत्सुकता असणारे महाशतक आज साजरे झाले ....सचिन निवृत्त हो म्हणणारे "अरे सचिन ? अजून १५ शतके करू शकतो " म्हणायला लागले ...तुटून पडणारी प्रसार माध्यमे पुन्हा ठरलेला कार्यक्रम फ़क़्त एक शतक वाढवून दाखवू लागले ... सचिन ला भारत रत्न मिळालाच पाहिजे या चर्चेला पुन्हा उधाण आले ...आणि सचिन ने शतक केले कि भारत हरतो हे सिद्ध करण्यासाठी संघ सहकारी झटू लागले ...हे सर्व होत असताना एक माणूस मात्र शांत होता ...प्रेमा इतकीच टोकाची टीकाही सहन केलेली मानसिकता ,आणि जवळपास २२ वर्षे क्रिकेट खेळल्याने आलेली परिपक्वता आपल्या वागण्यातून दाखवत होता .... नुसते शतक केले तरी मैदानावर " डान्स इंडिया डान्स " सादर करणारे अनेक "शतकवीर " आपण पहिले आहेत ...पण शतकांचे शतक करूनही खेळापेक्षा आणि संघा पेक्षा आपला आनंद मोठा नाही या भावनेने नेहमीच्या शैलीत bat आणि हेल्मेट हवेत उंचावून शांतपणे कौतुकाचा स्वीकार करणारा "महा शतकवीर " आज आपण पहिला ..... सचिन रमेश तेंडूलकर !!

Friday 16 March 2012

तो "राज" हंस एक..... !!


" कोणी न त्यास घेई खेळावयास संगे सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे दाऊनि बोट त्याला म्हणती हसून लोक ...पिल्लास दुक्ख भारी भोळे रडे स्वताशी भावंड न विचारी सांगेल ते कोणाशी ..जे जे त्यास टोची दावी उगाच धाक .... पिल्लू तळ्यात एक " माडगूळकरांच्या समृद्ध लेखणीमधून उतरलेल्या या ओळी राज ठाकरे यांना चपखल बसतात ! सर्वांनी नाकारलेले ,चेष्टा केलेले , सख्ख्या लोकांकडून परकेपणाची वागणूक मिळालेले ,सर्वांच्या टीकेचे धनी झालेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर हा माणूस एक दिवस राज्य करेल असे कोणाशी न वाटलेले राज ठाकरे !! शिवसेने शी असलेली निष्ठा ,बाळासाहेबांवर असलेली श्रद्धा पण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी असलेले वैचारिक मतभेद याचे वर्णन " विठ्ठल आणि बडवे " असे केलेले राज ठाकरे ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेच्या कार्यक्रमात अक्खे शिवाजी पार्क भरवून आणि गाजवून दाखवणारे बाळासाहेब यांच्या नंतरचे एकमेव राज ठाकरे ! सभा कशा भरवाव्यात...कशा गाजवाव्यात आणि कशा जिंकाव्यात ....लोकांच्या मानसिकतेची नस कशी पकडावी याचे बाळासाहेब यांच्या नंतरचे उत्तम उदाहरण राज ठाकरे ! शिवसेना सद्य नेतृत्वाशी कितीही वैचारिक आणि पाक्षिक मतभेद असले तरी बाळासाहेबांसाठी आणि मराठी मनासाठी नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी उभे राहणारे राज ठाकरे !! आज राज ठाकरे यांच्यावर लिहायचे कारण म्हणजे नाशकात त्यांनी " करून दाखवले ".... शिवसेनेने खो घालायची जय्यत तयारी केलेली असताना ,अनेकांनी आपल्या भूजातील बळ तपासायला सुरुवात केली असताना , पावर गेम व्हायची शक्यता असताना हाताने घड्याळाचे काटे उलटे फिरवून रेल्वे डब्यात कमळाची फुले भरून  सुसाट धावणे हा राजनीतीचा आणि राजकीय परिपक्वतेचा अत्युच बिंदू आहे !!

Wednesday 14 March 2012

सोंग ठेऊन गेलेला सोंगाड्या ...


चापून चोपून बसवलेले केस....ओठाच्या वर  बारीक पण भारदस्त मिशी , वाढत्या मापाचा सदरा , पायात लेंगा आणि त्याची लोंबणारी नाडी...चेहेऱ्यावर मिश्कीलपणा ,प्रेक्षकांना हसवण्याचा घेतलेला मक्ता , सामाजिक उणीवांवर मारलेला फटका , राजकीय पक्षांना काढलेला चिमटा  आणि द्वय अर्थी विनोदाचा खास कोल्हापुरी ठसका यामुळं मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अजरामर झालेले आणि विनोदवीर म्हटले कि हटकून मानाचे पहिले स्थान मिळवणारे कृष्णा कोंडके म्हणजे दादा कोंडके .... १४ मार्च १९९८ रोजी जेव्हा त्यांनी जगाचा निरोप घेतला तेवा विनोदाच्या मैदानात हास्याच्या तलवारीने लढणारा रांगडा पण मिश्कील योद्धा हरपल्याचे दुक्ख सर्व चाहत्यांना झाले ...विनोदवीर अनेक झाले पण "दादा " एकच....लालबाग मधील गिरणी कामगाराच्या घरी जन्म घेतलेला ....उमेदीच्या काळात अपना बझार मध्ये काम केलेला आणि नंतर अबाल वृद्धाना आपलस केलेला दादा म्हणजे असामान्य माणूस ...वसंत सबनिसांनी दादा ना पहिले नसते ..त्यांच्यातील गुण खणखणपुरचा राजा मध्ये पहिले नसते आणि "विच्चा माझी पुरी करा " लिहिले नसते तर सर्वांच्या विच्चा पुऱ्या करणारा सोंगाड्या कदाचित काळाच्या पडद्या आड कधीच लुप्त झाला असता ....

Monday 12 March 2012

१९ वर्षे न्यायाच्या प्रतिक्षेची !!

१२ मार्च १९९३ ! भारतीय लोकशाही ,समाजजीवन , अहिंसा ,शांतता या सर्वाना छेद देणारा ....भारताच्या सुवर्ण  इतिहासाची काळसर किनार !! आणि एका मोठ्या आणि निंद्य घटने नंतर लागोपाठ घडलेली हिडीस घटना ...६/१२/१९९२ ला बाबरी मशीद पडल्या नंतर लगेचच ३ महिन्यात मुंबई मध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणणे म्हणजे देवासाठी माणसाना मारण्यासारखे आहे ...हे स्फोट का झाले ? याच्या मागे कोण होते ? कोणी घडवून आणले ? यामागचा हेतू काय होता ? हे सर्व माहित असूनही १९ वर्षे खटल्याचे मुख्य आरोपी सापडत नाहीत आणि त्यादृष्टीने ठोस आणि वास्तवात पावले उचलली जात नाहीत हा भारतीय लोकशाहीचा ,न्याय व्यवस्थेचा ,तपास यंत्रणेचा ,सर्वच राजकीय पक्षांचा आणि या राजकीय पक्षांकडे देशाची सूत्रे देऊन स्वतः निवांत बसणाऱ्या मतदारांचा हा दारूण पराभव आहे ...आणि या पराभवाचे पडसाद पुढील कधी दशके उमटतील हे सर्वाना माहित असतानाही तेरी भी चूप या प्रकारे जे कार्य चालू आहे ते लज्जास्पद आहे !! 

Saturday 10 March 2012

राहुल द्रविड.....एक दुर्लक्षित राजपुत्र !!


१९७० साली प्रदर्शित झालेल्या "आनंद " चित्रपटात योगेश यांच्या लेखणीतून साकारलेले आणि मुकेश यांच्या आवाजाने अजरामर झालेले "जिंदगी कैसी है पहेली " गाण्यातील "कभी देखो मन नही जागे पीछे पीछे सपनोंके भागे ..एक दिन सपनोंका राही ...चला जाये सपनोंके आगे कहा ..जिंदगी ...." या ओळी राहुल द्रविड यास चपखल बसतात ! राहुल द्रविड म्हणजे भारतीय क्रिकेट ला पडलेले सुंदर स्वप्न ...कसोटी क्रिकेट मधील भारताचा मानबिंदू ...अपेक्षा पूर्ण करणारा हुकुमी खेळाडू ,गोलंदाजाच्या सहनशक्तीचा अंत पाहून हुकुमी फटका मारणारा तंत्रशुद्ध फलंदाज ...स्लीप मधील अप्रतिम क्षेत्ररक्षक ...अव्वल यष्टीरक्षक ..उत्तम कप्तान आणि प्रतिस्पर्धी संघाचा विजय आणि भारताचा पराभव यामध्ये उभी असलेली खंबीर भिंत ! राहुल द्रविड.....असामान्य कर्तुत्व आणि प्रतिभा असूनही "देवत्वा" पुढे झाकोळली गेलेली कारकीर्द तरीही " तू न थकेगा कभी तू न थमेगा कभी तू न मुडेगा कभी कर शपथ ...."या कवितेप्रमाणे तो चालतच राहिला आणि एक एक यशोशिखरे पार करतच गेला ! राहुल द्रविड...संघाच्या प्रत्येक अडचणीस एकांगी शिलेदाराप्रमाणे लढणारा लढवय्या ...अगदी सलामी करण्यापासून ते गेलेला सामना जिंकण्यापर्यंत सर्व करावे आणि सर्वांनी अवलंबून राहावे ते याच्यावरच ! राहुल द्रविड "बिग ३ " मधील सर्वात महत्वाचा आणि अविभाज्य घटक....कसोटीमधील चौथ्या डावातील आशास्थान ! राहुल द्रविड ...अप्रतिम फूट वर्क , क्षणार्धात होणारी मनगटाची हालचाल आणि बंदुकीतून गोळी बाहेर पडावी असा तंत्रशुद्ध फटका मारून रसिकांना मंत्रमुग्ध करणारा शैलीदार फलंदाज ! राहुल द्रविड.....एकदिवसीय सामन्यास अयोग्य असा शिक्का डोक्यावर बसूनही दहा हजारी फलंदाजांच्या पंक्तीत मानाने बसणारी असामी ! राहुल द्रविड....शांत आणि संयत स्वभावामुळे क्रिकेट या खेळास "सभ्यांचा खेळ " का म्हणतात हे सिद्ध करणारा आदर्श खेळाडू ! राहुल द्रविड ....मिडिया मध्ये फारशी प्रसिद्धी नसलेला ,विज्ञापन करण्यात माहीर नसलेला पण "अस्सल " चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा एक प्रतिभावान खेळाडू ...

Friday 9 March 2012

मोठेपणी लहानासारख का वागता येत नाही ?

एखादी गोष्ट कितीही हवी असली तरी हट्ट करता येत नाही ,मिळाली तरी 


हरकून जाता येत नाही ,नाही मिळाली तरी भोकाड पसरून रडता  येत 


नाही ,फुलपाखरे पकडत बागेत हिंडता येत नाही ,५० पैसे देऊन रस्त्याच्या 


कडेला बसलेल्या सुरकुतलेल्या चेहेऱ्याच्या म्हातारीकडून तिखट -मीठ 


टाकून आवळे /चट्टा मट्टा घेता येत नाही ,घरून खाऊ चा डबा आताशी 


मिळतच नाही ,२३ चा पाढा ,प्रमेय ,गुणाकार .भागाकार ,बडबडगीते 


असे "अवघड " काही आता परीक्षेत येतच नाही,कोणाकडेही पाहून 


निरागसपणे हसता येत नाही ,समोरच्याने काहीही केले तरी एका  


कॅडबरी साठी त्याला माफ करता येत नाही ,नाती तीच असली तरी 


नात्यातील गोडवा मात्र अनुभवता येत नाही खरच मोठेपणी 


लहानासारख का वागता येत नाही ?



Thursday 8 March 2012

महिलांचा लढा.....महिलांचा दिवस !!

" अपनी जगह से गिरकर

काहीके  नही रहते

केश ,औरत और नाखून

अन्वय करतेथे किसी श्लोक का ऐसे

हमारे संस्कृत टीचर

और मारे डर के जाती थी

हम लडकिया अपनी जगह पर !!

जगह ? जगह क्या होती है?

यह वैसे जान लिया था हमने

अपनी पेहली  कक्षा  मै ही

याद था हमे एक एक अक्षर आरंभिक पाठोन्का

" राम पाठशाला जा -राधा खाना पका

राम आ बताषा खा - राधा झाडू लागा

भैया अब सोयेगा -जाकर बिस्तर बिछा

आहा नया घर है

राम देख यह तेरा कमरा है

"और मेरा ?"

ओ पगली

लडकिय हवा धुप मिटटी होती है

उनका कोई घर नहीं होता

जिनका कोई घर नहीं होता

उनकी भला होती है कोनसी जगाह??

Tuesday 6 March 2012

बालपणाची किंमत......एक मोबाइल !!






बालपण हे माणसाच्या आयुष्याला पडलेले एक सुंदर स्वप्न असते ....स्वप्न अशासाठी कि एकदा पडलेले सुंदर स्वप्न पुन्हा पडत नाही आणि पडलेच तरी मूळ स्वप्नातील गोडवा त्यात असत नाही....आईच्या कुशीत झोपावे ,आजीच्या मांडीवर लोळावे ,बाबांच्या खांद्यावर बसून डोलावे,आजोबाना घोडा करून खेळावे , ताईचे बोट धरून चालावे आणि दादाला चीड्वावे...कितीही खावे ,कितीही झोपावे ,वाटला तर अभ्यास करावा नाही वाटला तर पोटात दुखतंय म्हणून नाटक करावे ,मित्रांच्या सोबत हुंदडावे ,फुलपाखराच्या मागे बागडावे ,भूभूच्या किंवा मनीच्या पिल्ला सोबत खेळताना तासनतास रमावं ,चांदोबा किंवा चंपक वाचत बसाव आणि चिऊ काऊ च्या गोष्टी ऐकत हसावं..घरातल्या कोणत्या तरी कोपऱ्यात फतकुल मारून बसाव आणि आजूबाजूच्या भिंती सह एखाद चित्र रंगवाव , २ घास खाण्यासाठी आईला २ तास घरभर पळवाव ,भीत भीतच बाबांकडे काहीतरी मागाव ..मिळालं तर हरकून जाव आणि श्रीमुखात मिळाली तर १/२ -१ तास रड झाल कि पुन्हा बाबांच्या मिठीत शिराव, कोणीही भेटला तरी त्याच्याकडे निरागसपणे पहाव आणि काका ,मामा काहीतरी जोडून आपलंसं कराव ,बोबड्या आवाजात एखाद बालगीत म्हणून आई बाबांच्या डोळ्यात माया पहावी तर अडखळत रामरक्षा म्हणून आजी आजोबांकडून खाऊ घ्यावा ....खरच अस बालपण आयुष्यात आणखी एकदा मिळाव !!

Sunday 4 March 2012

मोडेन पण वाकणार नाही....


६ फुट २ इंच अशी उंची ,धिप्पाड शरीरयष्टी ,गोलंदाजाने टाकलेल्या सुरेख चेंडूची पण चिरफाड करण्याची क्षमता ,सामना एकहाती फिरवण्याचे कौशल्य ,वेळप्रसंगी गोलंदाजी करायचेही कसब आणि याच गुणांनी वेस्ट इंडीज च्या महान खेळाडूत बसण्यास लारा नंतरचा योग्य खेळाडू ख्रिस गेल आणि कधीकाळी सर्वोत्तम मधील सर्वोत्तम खेळाडू दिलेली ,जगावर एकहाती अधिराज्य गाजवलेली ,क्रिकेट च्या इतिहासातील जवळपास सर्व विक्रम प्रथम नोंदवलेली पण सध्या अनागोंदी कारभार ,आर्थिक चणचण, गुणवान खेळाडू असूनही अपुरे मार्गदर्शन ,मोठ्या स्पर्धात केवळ सहभाग यामुळे डबघाईला आलेली वेस्ट इंडिअन क्रिकेट समिती यांच्यात "मोडेन पण वाकणार नाही " अशा तऱ्हेने मानापमानाचा खेळ चालू असल्याने एका गौरवशाली ,प्रतिभाशाली ,नैसर्गिक खेळाडूवर अकाली संन्यास घ्यायची वेळ येणार काय अशी चिंता आणि कधी काळी जग जिंकलेल्या संघाचा "नामिबिया " होणार काय असा प्रश्न प्रत्येक क्रिकेट प्रेमीस पडलेला आहे .....

Saturday 3 March 2012

सेक्सी शब्दाचे करायचे काय ?

एक जुना विनोद होता.....एक मुलगी वजन करायला वजनकाट्या वर उभारते ....जास्ती वजन पाहून पायातील चप्पल काढते ,अजून कमी होत नाही पाहुन खांद्यावरील पिशवी खाली ठेवते ,अजून कमी होत नाही म्हणून अंगातला स्वेटर काढून ठेवते आणि तिच्या हातातील नाणी संपतात ....अशा वेळी कोपऱ्यात शांतपणे उभा राहून हा प्रकार पाहणारा तरुण तिला म्हणतो "तुमचे चालुद्या माझ्याकडे भरपूर नाणी आहेत " आता या वाक्याचा अर्थ काय काढायचा ? म्हणजे त्याला त्या तरुणीला खरच मदत करायची आहे का आपले आंबट शौक पूर्ण करून घ्यायचे आहेत हे समजणार कसे ? तसेच काहीसे "सेक्सी" या शब्दाचे झालेले आहे ....NCW CHAIR PERSON ममता शर्मा यांनी जयपूर मध्ये "  "sexy" meant "beautiful and charming" so it should not be taken in a negative sense." अशा आशयाचे विधान करून त्यांची वैचारिक पातळी काय आहे आणि समाज नितीमत्तेपासून कसा झपाट्याने बाजूला जातोय  याचे  उत्तम  उदाहरण  दिले आहे ... सेक्सी या शब्दाचा सर्वसामान्य अर्थ कामभावना चेतवणारा /चेतवणारी एखादी व्यक्ती किंवा घटना असा घेतला जातो....आता कोणी तुम्हाला अशा विशेषणाने संबोधले तर तुमची अवस्था निश्चितच वजन करणाऱ्या मुलीसारखी होईल ..कारण शब्द समजत आहेत पण त्यामागचा अर्थ आणि अर्थामागची भावना मात्र समजत नाही आहे ....

Friday 2 March 2012

मला भाजी विकायची आहे ....

 प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असते कि आपल्या मुलाने शिकावे ,सुसंस्कृत व्हावे ,एक चांगला माणूस व्हावे आणि आपण निर्माण केलेले विश्व सांभाळावे आणि वाढवावे .....आधीच्या २ पिढ्या डॉक्टर असल्याने व मला पण आवड असल्याने मी डॉक्टर झालो,सुसंस्कृत  आणि चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करत आहे हे पाहून साहजिकच आईला स्वप्न पडू लागले कि मी आता वडिलांचा दवाखाना सांभाळणार आणि तिची इच्छा पूर्ण करणार....४-५ दिवस हातात अभ्यासाचे पुस्तक न दिसल्याने अस्वस्थ होऊन ६ व्या दिवशी तिने "वरच्या सा" मध्ये विचारले " काय ? काय ठरवलंय पुढे ?" .....थोडासा बिचकत ,घाबरत ,आईचा हात आणि माझा गाल यात यात सुरक्षित अंतर आहे ना याचा अंदाज घेत आणि तिच्या हातात झाडू ,लाटणे ,पट्टी ,पायात चप्पल नाहीयेना याची खात्री करत बोललो " आई आतापर्यंत तू -बाबा म्हणाल तसे वागलो ,शिकलो आता मला माझ्या मनासारखे वागायचं .....मला भाजी विकायची आहे ...." "कोणतेही काम वाईट नसते ,अगदी चांभार हो पण गावातला सर्वोत्तम हो " अशा गोष्टी तात्पर्यासह सांगणे सोपे असते पण "आपल्या कार्ट्याने त्या इतक्या मनापासून ऐकल्या आणि मनावर बिम्बवल्या आहेत " हे स्वीकारणे खूप कठीण असते ........

Thursday 1 March 2012

जेव्हा iron tablet मध्ये iron सापडते

भारतीय समाज व्यवस्थेत आणि वैद्यकीय क्षेत्रात "वैद्यांची " जागा "डाक्टर "ने घेतल्यापासून समाजातील बहुन्तांशी वर्गाचा आणि जवळपास सर्वच डाक्टर वर्गाचा वैद्याकडे आणि आयुर्वेदाकडे पहायचा दृष्टीकोन नकारात्मक रीतीने बदलला ...अमी जे करतो ते पूर्व आणि पुण्य ...आयुर्वेदिक वैद्य करतो ते पश्चिम आणि पाप असा समज सर्वांचाच झाला ...पण काळ हे सर्वांचेच औषध असते ...काळाच्या महिम्याने पुन्हा जगाला आयुर्वेदाची महती समजायला लागली आणि पुन्हा जग  आयुर्वेदाकडे आकर्षिले गेले ..तरीखी काही खडूस आणि संकुचित विचारसरणीचे लोक संधी मिळेल तिथे  आयुर्वेदावर टीका करायला तयारच असतात ...म्हणजे पदवी मिळाल्यावर आपल्याला आयुर्वेदावर बोलायचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि अमी तो पार पडणारच अशा अविर्भावात हे लोक वावरत असतात...आम्ही जेवा एखाद्या हॉस्पिटल मध्ये कामासाठी जातो तेवा ते प्रत्यक्ष काही बोलले नाहीत तरी त्यांची कुत्सित नजर बरेच काही बोलून जाते ... त्यांचे "आयुर्वेदिक औषध ला इफेक्ट नसतो तर साइड  इफेक्ट कोठला असणार ?" असा प्रश्न निश्चितच मेंदूकडे जाणारा रक्ताचा प्रवाह वाढवतो आणि त्यामुळे होणारी "प्रतिक्षिप्त " क्रिया थांबवण्यास फार कष्ट घ्यावे लागतात...