Monday 31 December 2012

दुध की दारू ?

 हा प्रश्न केवळ ३१ डिसेंबरलाच का पडतो हा माझ्यासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे ... असा प्रश्न पडणारा मी एकटाच की अनेकांना खाजगीत पडणारा प्रश्न सार्वजनिक ठिकाणी मांडणारा मी एकटाच ? नाही म्हणजे आपला बच्चन सांगतो " दारू पिनेसे लिवर खराब होता है  " किती मोठा सामाजिक संदेश न ? तरीही आपण त्याच्याच भाषेत उत्तर देतो " थोडी सी तो पिली है ...चोरी तो नही की है " ..... कौन कमबख्त केहता है के हम आदत की वजहसे पिते है हम तो पिते है के यहा आ सके तुम्हे देख सके  , उसे भूल सके ...इसलिये ....हमका पीनी है पीनी है हमका पीनी है .... लोग केहते है मै शराबी हु तुमने भी शायद यही सोच लिया...सोच लिया ?? हम्म तो फिर ....यारो  मुझे माफ करो मै नशेमे हु ....मै शराबी मै शराबी ...... !! कूल बडी ..... कोणता ब्रांड तुझा ?? अर्र ...अजून बिअर मधेच आहे डीअर bi a man .... अबे ....तू ड्रिंक नाही करत ? मग काय घेतो ? बोर्नविटा की होर्लेक्स ? चू ..आहेस बे तू .... चल ३१ आहे कमीतकमी ब्रीझर तरी ट्राय मार ...तू जिच्यावर लाईन टाकतो ना  ती वोडका मारते ...साला समज तिला डेट वर घेऊन गेला तर काय पाजणार ? फ्रुटी ?? हा हा हा हा ...... व्यर्थ आहेस रे तू ...चा मारी दारू जर इतकी महत्वाची आहे तर हे लोक " दुध " का वाटत आहेत ?? आणि ते पण केवळ १२ वाजे पर्यंत ? म्हणजे दारूची दुकाने १.३० पर्यंत उघडी आणि दुध केवळ १२ पर्यंतच ...१२ नंतर दुध प्यायचे असेल तर थर्मास भरून आणायला हवा पण ज्या जीन्स च्या खिशात मोबाईल " कोम्बावा " लागतो तेथे थर्मास कसा मावेल ? श्या बाबा .....३१ सेलिब्रेट तर करायचा आहे पण दारू पिउन की दुध पिउन ??

Monday 24 December 2012

देव निवृत्त झाला ..

काय म्हणू तुला ? अनेक जागतिक विक्रमाना गवसणी घालणारा विक्रमादित्य ? की  म्हणू तुला मास्टर ब्लास्टर ? अनेक क्रिकेट खेळाडूंसह जगातील सर्वच समीक्षकांनी ठरवलेला  डॉन यांचा वारसदार म्हणू ? की अनेक क्रिकेट खेळाडूंनी ज्याला पाहून आपली कारकीर्द सुरु केली , कारकीर्द सुरु करायचे स्वप्न पहिले म्हणून जागतिक आदर्श म्हणू ? म्हणू तुला तमाम गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारा निष्ठुर फलंदाज की त्याच गोलंदाजांच्या मनात प्रेम निर्माण करणारा सच्चा माणूस ? म्हणू तुला मला , माझ्या वयाच्या साऱ्यांनाच क्रिकेट ची आवड लावणारा महान माणूस की करोडो लोकांप्रमाणे देव ? म्हणू तुला शतकवीर की म्हणू तुला टीकांचा बादशाह ? म्हणू तुला स्वतःच्या पुतळ्याचे  दहन स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनही पुन्हा नव्या दमाने आणि ताकदीने आपल्याच लोकांची स्वप्ने पूर्ण करणारा अवलिया की  लोकांची प्रत्येक स्वप्ने पूर्ण करणारा शिल्पकार ? म्हणू तुला कॉंग्रेस चा खासदार की रंगीत खेळाला सभ्यतेचे आणि आक्रमकतेचे कोंदण देणारा चित्रकार ? म्हणू तुला तिकीट विक्रीचे हमखास साधन की माध्यमांच्या टी .आर.पी.चे माध्यम ? की  म्हणू तुला ...... वेळ आल्यावर आपले कर्तुत्व , कामगिरी ,विश्वविक्रम , कौतुक आणि टीका ,अजूनही खेळायची असलेली इच्छा आणि मोह मागे सोडून  सामान्य  खेळाडू प्रमाणे  शांतपणे २२ यार्डाची खेळपट्टी सोडून  जाणारा असामान्य जादुगार ..... सचिन रमेश तेंडूलकर !!

Saturday 22 December 2012

सातच्या आत घरात ?

 " काय आताच्या मुली ? काय ते कपडे ? केसाला तेल नाही , वेणी नाही झिंझ्या उडवत हिंडायचे ....वेळेचे भान नाही बापाचा धाक नाही . धाक ठेवायला बाप घरात आहे कोठे ? आणि पोरगी काय उद्योग करते ते बघायला आई घरी आहे कोठे ??  पैसे पैसे  करत संसाराच्याकडे दुर्लक्ष ..... मुलीनी कसे दिवे लागणीच्या वेळी घरी असावे ....  आम्ही लहान असताना खूप मजा केली पण सात च्या आत घरात ....पण आताच्या मुली ?? सात नंतर घरा  बाहेर ..... "  एक सत्तरीची फळविक्रेती बाजूच्या बाईला  ओरडून सांगत होती .... माझी खरेदी झाली होती पण दिल्ली सामुहिक बलात्काराचे परिणाम किती खोलवर झाले आहेत  हे ऐकून घ्यायला थांबलो होतो ... आपले कोणीतरी ऐकून घेते आहे हे बघून म्हातारीला चेव चढला ... मलाही सामाऊन घेत म्हणाली " दादा आता तुमीच सांगा ..... तुमची नजर कोणावर जाते ?? साडीतील बाई वर की ओढणीचा ड्रेस शिवलेल्या टवळी वर ?? " अरे बापरे .... तो अर्णब  किंवा निखिल वागळे पण इतका " स्पष्ट " प्रश्न विचारत नाही . बर उत्तर काय देणार ?? साडीतील असो वा तोडक्या कपड्यातील "स्त्री " वर नजर जाणे वाईटच न ? मी स्त्रियांकडे बघतच नाही म्हणजे नकळत दिलेला वेगळा संदेश आणि हो अमुक अमुक वेशातील स्त्री कडे पाहतो सांगणे म्हणजे  निर्लज्जपणे आपणच आपल्या संस्कारांचा ,मुल्यांचा केलेला बलात्कार आणि " बघा आताच्या मुलांना काही लाजच राहिली नाही .... " असे त्या म्हातारीला पुरवलेले मोफत इंधन . त्यामुळे प्रसंगावधान राखून फोन आल्याचे नाटक केले आणि सटकलो .....
                                     त्यांची पुढे चर्चा काय झाली, अंतिम निष्कर्ष काय  निघाला आणि  आणखी किती दादांना  तिने " बोल्ड " केले  याची उत्सुकता मनात कायम होती . त्याहून अधिक एक शल्य मनात बोचत होते ते म्हणजे स्त्रियांवरील अत्याचारांना स्त्रियांनाच जबाबदार धरायची आपल्या समाजाची मानसिकता . त्याची तुझ्यावर नजर का गेली ? कारण तू  त्याच्या नजरेत भरलीस , त्याने तुझा हात का पकडला ? कारण तू त्याला आवडलीस , त्याने शिट्टी का मारली ? कारण तू टंच कपडे घातलेस ...आम्हीही शिकलो आम्हाला नाही मारली कोणी शिट्टी , त्याने छेड काढली ? तूच पहिले असशील कधीतरी त्याच्याकडे म्हणूनच हिम्मत झाली त्याची , तू हसलीस ,तू बोललीस , तू ओळख वाढवलीस , तू प्रतिसाद दिलास , तू कमी कपडे घातलेस तू हे केलेस तू ते केलेस म्हणून त्याने असे केले .... तुझ्यावर बलात्कार झाला ? सांगितले होते कोणी अर्ध्या रात्री हिंडायला ? लाज सोडून हिंडायचे मग लाज जाणारच .....आठवा ... तुमच्या घरात , सोसायटीत , कट्ट्यावर , ओळखीच्या घरात ,किंवा समाजात वावरत असताना एकदा न एकदा तुम्ही नक्कीच या वाक्यांना सामोरे गेला असाल , क्वचित यासम वाक्यांचा प्रयोगही केला असेल ...कारण एकदा  शारीरिक अत्याचार झाल्यावर पुढे आयुष्यभर मानसिक अत्याचार करण्यात आपण माहीर असतो . तिच्यावर कोणती वेळ आली आहे याचा विचार न करता " सात " ची वेळ दाखवण्यात आपण तत्पर असतो ....
                                         तिने कोणा कोणापासून स्वतःला जपायचे ? टपरीवर बसलेला पक्या ? बस मधला चालक -वाहक ? कॉलेज  मधील त्याच्या  पासून ? की कॉलेज मध्ये  नसूनही पाठलाग करणाऱ्या उनाडांपासून ? वर्गातील मास्तरापासून की  प्यून पासून ? खाकी वेशातील पोलिसापासून की खादीतील नेत्या पासून ? स्वतःच्या भावा पासून की जन्मदात्या बापा पासून ?ओरबाडायला टपलेल्या समाजापासून की काही पैशासाठी अमुल्य अब्रू विकणाऱ्या आई पासून ? कोणापासून जपायचे ..... ? आणि कोणत्या वयापर्यंत ? ४-५ वर्षापासून ते ७०-७५ वर्षापर्यंतच्या सर्वच महिलांनी आपली अब्रू वाचवायला धडपडायचे ? काही आकडेवारी देतो National Crime Records Bureau data for 2011 नुसार २०११  साली  नोंद  झालेल्या २२,५४९  घटनात पालक किंवा  जवळचे मित्र  यांचा सहभाग १.२% ( २६७/२२,५४९ ) ,शेजारी ३४.७ % ( ७८३५ /२२,५४९ ) , नातेवाईक ६.९% (१,५६० /२२,५४९ ) . आता यावर विचार केला पाहिजे कि तिने विश्वास ठेवायचा कोणावर ? आता " विश्वास "म्हणजे पण "पुल्लिंगी " शब्द .....कधी दगा देईल सांगता येत नाही . अशा वेळी करायचे काय ? सात चे बंधन येथे कसे लावायचे ? कि नवीन कायदा करायचा ( तसेही आपल्या देशात सध्या अतर्क्य कायदे संमत करून घेण्याचे सत्रच सुरु आहे ..त्यात आणखी एकाची भर ) की  कोणत्याही स्त्रीला संध्याकाळी ७ नंतर भेटू नये , तिला बाहेर घेऊन जाऊ नये ..तसे करताना कोणी आढळल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल ...करायचे ? बंधने हि तिच्या पाचवीला पुजलेली आहेत .... तुला कोणी चुकीचे समजू नये म्हणून किंवा तुझ्यासोबत कोणी काही चुकीचे करू नये म्हणून बंधन हे महत्वाचे ....
                                            पण त्याचे काय ?? " पाखरू आलय नवीन ओढ फडात किंवा वाड्यावर " पासून " दिल सांड हो तो हर औरत भैस दिखाई देती है मेरी जान  " इथ पर्यंतचा स्वैर आणि स्वैराचारी प्रवास विसरून जायचा का ? क्वचित प्रसंगी तिचे मन पाहणारा आणि दाखवणारा आपला समाज ,चित्रपट , आपण स्वतः आपली मानसिकता कधी बदलणार ? लैंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी अजून किती पाशवी प्रकार करणार ? " दिल्ली मध्ये झालेल्या घटनेतून सुद्धा पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मिडिया ने दिसेल त्या बाईला  " स्त्री म्हणून कसे वाटते ? " विचारून मगरीचे अश्रू काढण्या पेक्षा त्या  लोखंडी सळीची केवळ कल्पना करून पहावी ..कसे वाटते ते कोणाला विचारायची गरज नाही भासणार . आपली , आपल्या मानसिकतेची , लोकशाही च्या चौथ्या स्तंभाची एक विकृत मानसिकता आहे कि एक घटना झाल्यापासून दुसरी होई  पर्यंत आपण निद्रिस्त असतो .झालेल्या घटनेतून धडा न घेता केवळ उसासे टाकत बसतो . गुवाहाटी येथे झालेल्या घटने नंतर काही कडक पावले उचलली असती तर इतका भयंकर प्रकार आता झाला असता का ? पण झाला ... एक दिवस राष्ट्रीय प्रश्न झालेली पिडीत मोदी यांच्या विजया नंतर  गायब झाली ...काही दिवसांनी सचिनची निवृत्ती पुन्हा उचल खील आणखी काहीतरी होईल आणि ती पिडीत विस्मृतीत जाईल ...फेसबुक वर काळे ठिपके लाऊन , काही मेणबत्त्या  पेटवून , मोर्चात नाममात्र सहभाग नोंदवून आपण आपले आणि राजकीय लोकांनी नेहमी प्रमाणे  देऊन आपले कर्तव्य पार पडलेच आहे ....
                                               या पिडीतेचे पुढे काय होईल , तिचे पुनर्वसन होईल का ? , मानसिक आघातातून ती सावरेल का , समाज तिला स्वीकारेल का ? फाशी हे बलात्काराचे उत्तर आहे का ? कि मानसिकता सुधारण्यास काही करावे लागेल ? शिक्षेने कदाचित प्रकार कमी होतील पण थांबतील का ? असे अनेक अनुत्तरीत प्रश्न  डोळ्यासमोर नाचत आहेत आणि त्याहून अस्वस्थ करत आहे ती स्त्रियांची आपल्या मनातील खालावलेली प्रतिमा ज्यांनी सात च्या आत घरात पहिला असेल त्यांना एक वाक्य नक्कीच आठवत असेल कि " साहेब माझी चूक फ़क़्त इतकीच झाली कि झाकण सारलेल्या भांड्यावर माझी नजर गेली " .... आपल्या चुकीचे याहून निर्लज्ज समर्थन काय असू शकते ??  पण काय करू शकतो आपण ?? स्त्रियांवरील अत्याचाराला स्त्री जबाबदार नसते इतकी वैचारिक प्रगल्भता आपल्यात आली तर " मग कोण जबाबदार असतो ? " यावर विचार करायला वेळ मिळेल आणि " सात च्या आत घरात " या मानसिकतेतून आपली  सुटका होईल ....
                                        
 data  ref - the hindu - executing the neighbour                  

Saturday 15 December 2012

त्रिफळा ...

माझे उनाड बालपण  दोन गोष्टीनी व्यापून टाकले होते . एक फळा आणि दुसरा त्रिफळा . एक घरच्यांनी ,समाजानी माझ्यावर लादलेला तर दुसरा मी स्वतः स्वीकारलेला . मैदान खेळाचे असो वा अभ्यासाचे दोन्ही ठिकाणी " त्रिफळा " उडू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागायची . अर्थात त्रिफळा म्हणजे काय याची जाण असायचे ते वयच नवते पण  मार खायची व्यवस्थित शारीरिक आणि मानसिक तयारी करून घरी "प्रगतिपुस्तक " दाखवताना वादळा पूर्वीच्या शांततेत आणि हात-पट्टी-पट्टा -काठी किंवा प्रसंगी हाती सापडेल ते साधन माझ्या नाजूक अंगावर आदळायच्या  आधी " काय ? यंदा पण उडला का त्रिफळा " हे शब्द कानावर  आदळायचे. बाबांच्या मांडीवर बसून क्रिकेट सामना बघत असताना त्यांना आपल्या खेळाडूचा त्रिफळा उडल्यावर होणारे दुक्ख आणि प्रतिस्पर्धी खेळाडूचा उडल्यावर होणारा आनंद ....सामना  खेळायला  गेल्यावर  फलंदाजाचा त्रिफळा उडवण्यासाठी  केलेले प्रयत्न ...म्हणजे रबरी चेंडूवर थुंकी लाऊन अर्ध्या चड्डीच्या कोणत्यातरी कोपऱ्यावर रगडल्याने त्रिफळा उडतो का ? पण जर "वानखेडे " वर उडू शकतो तर येथे का नाही ?? हि बाल मानसिकता असो ... पुढे मित्रांच्या तोंडून अरे यार तिने "बोल्डच  " केले मला ...अशा एकंदरीत प्रसंगातून त्रिफळा हा माणसाच्या यश -अपयश , अस्तित्व , ओळख , प्राक्तन आणि जीवनशैली  यांच्याशी निगडीत असतो अशी मानसिकता तयार झाली ... आणि त्रिफळा हा वैगुण्य ,कमतरता ,दुर्दैव यासारख्या प्रत्येक नकारात्मक गोष्टीचा प्रतिक बनला .....

Saturday 8 December 2012

मास मधला क्लास



ए  तो पोपटी  शर्ट  घातलेला माणूस बघ ..काय पोपट दिसतोय ..हाहा !! काय तेल लावलंय त्या बाईने ?  इतके तेल जर गावातल्या प्रत्येक बाईने लावले तर लवकरच "तेलयुद्ध " भडकेल ..हा हा !! निळी  जीन्स घातलेली ती मुलगी वर गोविंदा पिवळा टी शर्ट आणि यात कमी म्हणून कि काय करकचून बांधलेल्या वेणीत माळलेला अबोलीचा गजरा ...वा .... !! " अर  त्या *** बंड्याने ५०० रुपये बुडवल माझ ...त्याच्या आईच्या *** ..घावूदेत एक डाव ..आयची आण  भोसकतोच रा**च्याला " समज खरच भोसकले तर रक्ताची चिळकांडी किती लांब उडेल हे दाखवायला म्हणून कि काय पानाने भरलेल्या  तोंडातून दूरवर  टाकलेली लालभडक पिंक .....EWWW ....सायकलवरून फाटक धोतर सांभाळत आलेला मामा ,कासऱ्याने सजवलेल्या गाडीवरून गळ्यात  सोन्यासारख्या दिसणाऱ्या ४-५ चेन आणि हातात ७-८ अंगठ्या घालून आलेला तात्या , कट्ट्यावर अडकित्त्याने सुपारी फोडत बसलेला अण्णा , केसाच्या कोंबड्या वर सिगारेट चा धूर जाईल याची काळजी घेत फुकणारा पक्या , बसायला जागा नाही म्हणून पोरा टोरांसह जमिनीवर फतकुल मारून बसलेली अक्का ,केळ आणि पेरू खायची सोडा पुन्हा पहायची सुद्धा इच्छा होऊ नये अशा विलक्षण पद्धतीने खाणारी कार्टी .... हाताने काही गोष्टींची सफाई केल्यावर हातालाही सफाईची गरज असते हे विसरून माल विकणारा सरबतवाला आणि भडंग वाला .....या सर्वाचे निरीक्षण करत एका कोपऱ्यात उभा राहून त्यांच्या अवतारावरून त्यांच्या नावाची आणि एकंदरीत आर्थिक -सामाजिक -वैचारिक स्थितीची तलाश करायचा प्रयत्न करणारा मी  ....तलाश  पुरते ठीक आहे पण यांच्यासोबत " तलाश " पहायचा ?? "मी " ????????

Saturday 1 December 2012

सायकल....


 रस्त्यावरून तुफान वेगाने गाडी चालवत असताना वाटेत कोणी सायकलवाला आला की चाकांची गती कमी होऊन अचानक जिभेची गती वाढते . सायकलस्वार वयस्कर असेल तर  इज्जतीत इज्जत काढणे आणि समवयस्कर ,त्यातल्या त्यात पेंद्या असेल तर ठेवणीतले शब्द बाहेर काढून त्याच्या कानाखाली शाब्दिक ठेऊन देणे नेहमिचेच ....हे नियम  उन्हाने  रापलेल्या मजबूत दंडावर ताईत बांधलेल्या ,घनदाट केसात ओतलेले  एक वाटी तेल ओघळून जाडजूड कल्ले आणि  मिशांच्या आकड्यापर्यंत येणाऱ्या ,पान चघळत ,केरेज वर फावडे किंवा चमकणारी कुऱ्हाड लाऊन रस्त्याच्या मधोमध मुजोरीने मजुरीसाठी  जात असलेल्या सायकलवाल्याला लागू होत नाहीत . यड लागलय काय राव ?? त्याला थांबवले तर आधी त्याची भेदक नजर पाहून पसार झालेली हिम्मत एकत्र करून काही बोलेपर्यंत त्याच्या तोंडून आजपर्यंत कधीही न ऐकलेले शब्द कानावर आदळतात .... त्याचा अर्थ कळेपर्यंत ओळखीचा एक (अप )शब्द तोंडावर आणि लालभडक पिचकारी जमिनीवर मारून तो पुढे गेलेला असतो ...जाऊदेरे  गडबड होती म्हणून सोडला ...नाहीतर आज कापलाच असता ... ( ब आणि भ ची बाराखडी ) .... हा प्रसंग शहरात राहणाऱ्या लोकांना खूप कमी वेळा आला असेल पण ....विचार करा .. ऑफिस (एकदाचे ) सुटलंय .. घरी जायची गडबड आहे .. समोर १२० सेकंदांचा सिग्नल पडायची वाट पाहतोय .. ५..४..३..२ अरे सुटलो ..अचानक एक सायकलवाला "कट " मारून पुढे जातो आणि .....पोलिसाच्या ढेरीहून थोडासा लहान लाल दिवा कशी मजा झाली म्हणून तुमच्याकडे पाहून हसत असतो .... अशावेळी काय विचार येतात डोक्यात ?? चा मारी एक फालतू सायकलवाला मला कट मारतो ?मला ?? लायकी आहे का त्याची ? साल्यांना बोंबलत फिरण्याशिवाय काही काम असते का ? एखादी ऑडी पुढे गेली असती चालले असते पण सायकल ???

Friday 23 November 2012

कासाबची फाशी , फेसबुक आणि आपण ..

२६/११ दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाब याच्या फाशी  नंतर देशात (बऱ्याच  वर्षांनी ) आनंदाची लाट पसरली .प्रतिक्रिया घेण्यास आणि त्या "सबसे तेज " प्रसारित करण्यात प्रसारमाध्यमांची गडबड सुरु झाली .  संबंधित त ज्ञ मंडळी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली  सामान्य माणूस मात्र हातचा रिमोट जोरजोरात  दाबत  कधी हा चेनेल ( वृत्तवाहिनी)  तर कधी तो पाहत "एक पाऊल पुढे " राहण्याचा प्रयत्न करत होता . रिमोटला जीव असता तर माणसाच्या उत्सुकतेची किंमत मोजता मोजता तो नक्कीच "शहीद " झाला असता . असो ! पण........ जो  कसाब करकरे ,कामटे ,साळसकर यांसारख्या नरवीरांच्या तसेच माझ्यासारख्या  अनेक सामान्य माणसांच्या मृत्यूस जबाबदार होता ,त्यास फाशी झाल्यावर मी बोलायचे नाही ? मी नुसते वृत्तपत्र -वाहिन्या पहात माझा वेळ घालवायचा ? माझी मते ,माझा आनंद ,माझा कसाब -पाकिस्तान बद्दलचा राग कोठे बोलायचा ? वृत्तपत्र माझे "जहाल " विचार छापतील का ? अनेक प्रश्न अनेक भावना पण व्यक्त करायच्या कोठे ?? माझे "ठाम " मत सर्वाना कसे सांगायचे ...शे बुवा .... आम आदमी को आम का भाव भी नही मिलता ... :(  उदास "फेस " वर अचानक आनंदाचे भाव प्रकटतात ,डोक्यातील राग  बोटांकडे वळू लागतो आणि " बोटे चालती फेसबुक ची वाट " ......

Saturday 17 November 2012

बाळासाहेब ..पुनरागमनाय च !!

उस दर आंदोलनाने पेटलेल्या दिवाळीत अनेक जण  बस -उस - टायरी   जाळून   उरलेल्या  वेळेत फटाके उडवून  आणि फराळ खाऊन दिवाळी  साजरी करत होते . आंदोलन रोज चीघळत होते कोणी कोणाची जात काढत होते तर कोणी कोणाचा बाप काढत होते . शेतकऱ्यांच्या मनातील असंतोष जाळपोळीतून व्यक्त होत होता ,सामन्यांच्या दिवाळी चे दिवाळे निघाले होते ,२ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारने "सुतक " दिवाळी भेट म्हणुन दिले होते . जाणता राजा  काही करत न्हवता पण या सर्व परिस्थितीत सर्वांचे लक्ष लागले होते "मातोश्रीकडे "...... गेल्या  ४० वर्षात महाराष्ट्रात -देशात घडलेल्या कोणत्याही घटनेवर "बाळासाहेब " प्रतिक्रिया देत नाहीत तोपर्यंत ती घटना पूर्णच झाली नाही असे मानणारा जो मोठा वर्ग आहे त्यातील मी एक सामान्य माणूस ... बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाने , स्वभावाने आणि वक्तृत्वाने भारावलेला ...

Saturday 10 November 2012

एकांत

राजे रजवाडे यांचा काळ लोटून जरी काळ झाला असला  त्यांचे आयुष्य  मालिका - चित्रपट  यातून पाहता  येते .. अनेक योजने पसरलेला विस्तीर्ण प्रासादा मधील रुप्या चे छत असलेला महाल , सोन्याच्या सिंहासनावर रुबाबात बसलेला राजा ,समोर चालू असलेले अप्सरांचे कलादर्शन , एका हाती हातभार दूर ठेवलेले खड्ग तर दुसऱ्या हाती कोणत्यातरी पेयाने भरलेला प्याला .... सर्व काही उत्तम सुरु असताना अचानक एक दूत राजाच्या कानात काहीतरी बोलतो ...चेहेऱ्यावर काहीसे चिंतेचे भाव आणून मिशांवर जमा झालेले  पेयाचे थेंब आपल्या रेशमी वस्त्राने अलगद पुसतो ...काही क्षण विचार करून "  एकांत किंवा तख्लीयत " असे म्हणताच भरलेला सारा महाल काही क्षणात रिकामा होतो आणि शिल्लक राहतो राजा आणि त्याला हवा असलेला एकांत ... !! इतका सुखाचा एकांत आपल्या नशिबात नसला तरी राजाच्या नशिबात असलेला दूत आपल्याही नशिबात आहे .. मग तो व्यक्ती असो व काही प्रसंगाची आठवण , आपले कार्य चोख पार पाडतो !!                              विस्तीर्ण पसरलेल्या जंगलाला काही क्षणात भस्मसात करणारा वणवा अधिक धोकादायक कि आग विझल्या नंतर कोणत्यातरी जळक्या ओंडक्या खाली धुगधुगत असलेली एखादी ज्वाला अधिक धोकादायक यावर व्यक्तिपरत्वे मत मतांतरे असू शकतात परंतु माहित असलेल्या चिंता -भय किंवा काळजी ने मनास होणाऱ्या यातनेपेक्षा गतस्मृतींच्या पेटाऱ्यात , मुद्दाम  विसरलेल्या काही घटना -आठवणींच्या अस्तित्वाची खूण म्हणून वास करणारी स्मृती हि अधिक धोकादायक असते यावर कदाचित कोणाचेही मतमतांतर असणार नाही !! भावनावेग असो वा शोकाकुल स्थिती काही काळानंतर वेग हा कमी होतोच पण जसे नदीचा पूर ओसरल्यावर मुळ नदीतीरावर त्याच्या खुणा शिल्लक राहतात तश्याच मनावरही असतात .... ना धड वाळलेल्या ना धड वाहत्या ! अचानक बहुत प्रयत्नाने घातलेले कच्चे टाके उसवतात आणि अनामिक निराशेने आयुष्य व्यापून जाते ... नक्की कोणत्या आठवणीने आपण अस्वस्थ आहोत हे हुडकण्यासाठी सर्व गतस्मृतींची पुन्हा उजळणी होते आणि रोग बरा पण इलाज नको अशा निष्कर्षाप्रत आपण येऊन पोहोचतो ...असेच काहीसे माझ्या बाबतीत झाले ...

Sunday 21 October 2012

दादा खायाला....



                             असाच कोणता एक पुण्यातील रविवार .... वेळ असेल साधारण रात्री ९.३० ची .... जे .एम . रस्त्यावर गप्पा मारत  आईस्क्रीम चा आस्वाद घेत उभा होतो ... समोरील रस्त्यावरून वाहणारी तरुणाई पहात होतो आणि गर्दीत कोणी लक्षवेधी दिसले तर नजरेने टिपत होतो ..गप्पांचा  ओघ , आईस्क्रीम ची चव  आणि लक्षवेधी दिसण्याची  सरासरी परमोच्च बिंदूवर  असताना रस्त्यावर नेहमीप्रमाणे  बेशिस्तीने लावलेल्या  गाड्यातून वाट काढत एक साधारण १० -12 वर्षाचा मुलगा माझ्याजवळ आला . कोपराला अलगद स्पर्श करून चेहेऱ्यावरचे  दीनवाणे भाव  , डोळ्यात लाचारीने किंवा सवईने  आलेले पाणी दाखवत  खोल  आवाजात म्हणाला " दादा खायाला " ....हा माझा भाऊ  ?? कोण लागून गेला हा माझा ? काम करायला नको नुसते हात पसरायला हवेत आणि म्हणे खायाला ... मला काय पैसे वर आले आहेत का वाटायला  ? प्रत्येक चौकात २-४ भेटतात, प्रत्येकाला वाटत बसलो  तर माझ्यावर  पण अशीच वेळ येईल "साहेब खायाला " त्यावेळी मला कोणी देणार आहेका  ?? शी ....मी अन असा ?? अरेरे  ...विचार डिलीट .. ! असे सामान्य माणसांप्रमाणे अनेक भावनांचे तरंग माझ्या तात्पुरत्या असंवेदनशील मनावर उमटून गेले आणि तोंडातून  बाण बाहेर पडावेत तसे शब्द बाहेर पडले " मार खाशील पुढे जा ... " कदाचित "खाशील " या शब्दात त्याला कोण आशावाद दिसला असावा म्हणून डोळ्यातून पाणी आणून ,दोऱ्याने  बांधलेली  चड्डी  एका हातानी पुन्हा जागेवर  नेऊन म्हणाला " दादा खायाला ..... " त्याची पावले पुढे पडत होती पण एकसारखा तो मग वळून पहात होता जणू त्याची नजर आता बोलायला लागली होती " दादा खायाला .... "

Saturday 13 October 2012

फेसबुक दुखरी बाजू .....


मानवी आयुष्यात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर जितकी क्रांती झाली त्याहून काकणभर अधिक क्रांती तरुणांच्या आयुष्यात "सोशल नेटवर्किंग साईट्स " च्या आगमनाने झाली असे म्हणायला हरकत नाही ... पूर्वी एखाद्या व्यक्तीची प्रसिद्धी, त्यांचे कर्तुत्व , त्यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या आणि त्यांचे अनुकरण करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येनुसार मोजली जायची ... " बुंद से गई वो हौद से नही आती " या विचारसरणीचा डोक्यावर पगडा असल्याने प्रसिद्ध होणारे बहुतेक लेख , साहित्य , विचार आणि त्या अनुशंघाने होणारा आचार यात सुसूत्रता, वैचारिक- तात्विक चौकट आणि संस्कारांची बैठक दिसून यायची .. आपल्याला उपलब्ध झालेले व्यासपीठ हे शाश्वत नाही याची जाण होती त्यामुळे आपले महत्व , विद्वत्ता आणि पांडित्य सिद्ध करण्यासाठी सतत लेखन -वाचन -मनन आणि चिंतन करण्यात  तरुणाई व्यस्त असायची ... पण आयुष्यात सोशल साईट्स च्या आगमनाने हे सारे संकेत जणू मोडून पडण्यास सुरुवात झालेली आहे ... एखादी व्यक्ती किती लोकप्रिय  ? जितका  त्या व्यक्तीचा सोशल मित्रपरिवार असेल तितकी ... एखादी व्यक्ती किती प्रसिद्ध ? जितके या व्यक्तीच्या एखाद्या पोस्ट ला लाइक्स असेल तितकी .... त्यामुळे अशी प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकदा इतरांचे विचार थोडेफार बदलून आपलेच म्हणून मांडले जातात आणि येथेच संपते नवनिर्मितीची आस ..... अशा प्रसिद्धीची इतकी सवय लागते की अनेकदा आपले खाजगी आयुष्य आपण किती सामाजिक करत आहोत याची जाण रहात नाही .....

Sunday 7 October 2012

चीप बॉस

तुमचा स्वभाव तापट आहे ? लहान सहान कारणावरून तुम्ही आदळा आपट करू शकता ? २४ x  ७ तुम्ही कोणाचे "बौद्धिक " घेऊ शकता ? तुमचा काही "काळा" भूतकाळ आहे ? तुमच्या एकांतातील कोणता एम .एम .एस फुटला आहे ? बाकी डोके शून्य  असले  तरी  दिसायला   तुम्ही सुंदर  आहात ?? स्विमिंग पूल मध्ये "जलक्रीडा " करायची तुमची तयारी आहे ? सर्व जगासमोर अंगाला "क्रीम " कसे लावायचे याचे प्रात्यक्षिक दाखवू शकता ? भांडी घासणे -घरातली कामे करणे याचे नाटक तुम्ही करू शकता ? २४ तास तुमच्यावर केमेरा रोखला आहे हे सहन करू शकता ? जेथे केमेरा पोहोचत नाही तेथे ज्या कारणासाठी आपण (कु)प्रसिद्ध आहोत अशा लीला करण्याचे चातुर्य अंगी आहे ? अधूनमधून उगाचच भावनांचे उमाळे काढत रडायची सवय आहे ? ??? हो ?? तर वेळ दडवू नका .... बिग बॉस तुमचीच वाट पहात आहे ....

Sunday 30 September 2012

पेपर नसलेली सकाळ.....



                      सुटीचा दिवस असल्याने घेतलेली मनसोक्त झोप , आळस देत हाती घेतलेला कॉफीचा कप , रेडीओ  वर रोजच वाजणारी पण आज गुणगुणावीशी वाटणारी गाणी , कॉफीचा रिता  कप बाजूला ठेऊन पुन्हा गादीवर लोळण्याचे स्वातंत्र्य , स्वयंपाकघरात चालू असणाऱ्या स्वयंपाकाचा आज काहीतरी वेगळाच आणि हवा हवासा वाटणारा सुवास , कॉलेज च्या आठवणी ताज्या करत मोठ्याने गाणी लाऊन घासलेले दात आणि गाणी गुणगुणत केलेली अंघोळ ....प्रसन्नचित्ताने नाश्त्याचा घेत असलेला उपभोग ...या सगळ्या वातावरणात लक्ष मात्र दाराकडे असते ...मन आतुरतेने एकाची वाट पाहत असते .... सुखी मनसोक्त दिनचर्येत अस्वस्थपणाची जाणीव करून देत असते ...कोण ? कोण तो ? काल सकाळीतर भेटला होता ...मला जेव्हा झोपायला ,गाणे गुणगुणायला ,आस्वाद घेत कॉफी प्यायला , पुन्हा एकदा डुलकी काढायला , गाणी ऐकत अंघोळ करायला वेळ न्हवता तेव्हा त्याच्यासाठी मात्र " विशेष वेळ राखून " ठेवला होता ... आणि आज तो नाही ?? रोज किती गडबडीत पाहतो मी त्याला ...आज जरा निवांत वेळ आहे तर तो नाही ....तो ... आज का आला नाही ?? काय करू काय आज मी ?? येरझाऱ्या घालण्या पलीकडे मी करू तरी काय शकतो .... आज त्याने सुटी घेतली आणि माझ्या सुटीची मजा घालवली .... श्या राव ...पेपर यायला हवा होता आज ...

Friday 28 September 2012

जरा याद करो कुर्बानी ..

आजचा शुक्रवार कसा बसा ढकलला की शनिवार- रविवार सुट्टी सोमवारी बुट्टी मारली की मंगळवारी पुन्हा गांधी जयंतीची सुट्टी .....सही ..... कल्ला यार सलग ४ दिवस सुट्ट्या ... कूच तो तुफानी करते है यार ... कोठे जायचं ? अलिबाग ? महाबळेश्वर -लोणावळा काय ग १-२ दिवसात होते ..एक काम करू ..गो गोवा .... मी तर ताणून झोपणार बघ ... घरी जाऊन येतो ४ दिवस...परत दिवाळी शिवाय सुट्टी नाही ... थांब बे .. घरी जाऊन काय स्वयपाक करायला शिकणार आहेस का ? हि बघ मुलगी असून हिला काही येत नाही करायला ....ए गप हा .... प्लान करा रे काहीतरी ...राडा करू ४ दिवस .... अशी चर्चा प्रत्येक कॉलेज कट्ट्यावर सध्या ऐकू येत आहे ..कितीसे वय ? १६-२२ या वयात कोणी .... भारताला स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे , त्यासाठी आपण त्याग केला पाहिजे , सरफरोशी की तमन्ना ... मेरा रंग दे बसंती चोला असे कोणी म्हणत असेल ?? त्यासाठी आयुष्याचे समर्पण करत असेल ?? ए काय रे चिकट ..काहीपण फेकतो काय बे ?? उगाच सकाळी सकाळी डोक्याची मंडई  करू नकोस .... शाहीद कपूर ची लफडी आणि शाहीद आफ्रिदीचे रेकॉर्ड तोंडपाठ असलेल्या तरुणाईला "शहीद भगत सिंग " कसा माहित असणार ?? म्हणूनच २७/०९/२०१२ हा भगतसिंग यांचा जन्मदिवस यंदाही  विस्मृतीत  गेला .....

Wednesday 26 September 2012

वृत्तपत्रविक्रेता - एक दुर्लक्षित " सेलिब्रिटी "

घराचे किंवा ऑफिस चे टेबल ,टपरीवरचा मातकट बाक किंवा पंचतारांकित हॉटेल मधले अलिशान कोच ,रेल्वे चा डबा  किंवा फेरारीची सीट , कॉलेज चा कट्टा  किंवा फेसबुक ची वाल ,फेसाळता मद्याचा प्याला किंवा चहा /कॉफी चा घुटका , देशी तंबाखू चा झटका ते मार्लब्रोचा झुरका ,खेळाचे मैदान ते कलेचे दालन ...अशा भिन्न ठिकाणच्या ,भिन्न आर्थिक सामाजिक चौकटी असणाऱ्या  जागेत एक गोष्ट मात्र समान असते ती म्हणजे "वृत्तपत्र " ...हे वृत्तपत्र मध्यवर्ती ठेऊन सिनेमातील नटीच्या कमी झालेल्या कपड्यापासून ते वाढलेल्या शेअर मार्केट पर्यंत ,ऑलिम्पिक पासून सचिन च्या निवृत्तीपर्यंत ,एखाद्या उत्पादनाच्या यशापासून ते चित्रपटाच्या अपयशापर्यंत, राजकारणातील अर्थकारणापासून ते समाजकारणातील राजकारणापर्यंत ,दुष्काळापासून अतिवृष्टीपर्यंत ,दुध संघाच्या अध्यक्षीय निवडणुकीपासून ते अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत ,गुन्ह्याच्या काळ्या छायेपासून ते कलेच्या दालनापर्यंत अनेक असामान्य व्यक्तींच्या महानतेच्या कामगिरीची आणि सामान्यांच्या महानतेपर्यंतच्या प्रवासाची माहिती लिहिणारे संपादक -उपसंपादक - वार्ताहार आणि ते आवडीने वाचणारा वाचक वर्ग या दोहोंना जोडणारा दुवा म्हणजे " वृत्तपत्र विक्रेता " कायमच दुर्लक्षित राहतो .....

Wednesday 19 September 2012

बदललेला गणेशोत्सव

वेळ असेल साधारण सकाळी १० ची ...घरात नेहमीपेक्षा जास्ती वेगाने गडबड चालू होती ... मधूनच एखादे भांडे खाली पडत होते त्याचा आवाज शांततेमुळे घरभर घुमत होता ... फोनवरून  गणपती चतुर्थी च्या शुभेच्छा घेण्यात आणि मोदकाच्या सारणात कोणता जिन्नस किती प्रमाणात घालायचा याचे मोफत मार्गदर्शन करण्यात आई व्यस्त होती ....देवाची पूजा करण्यात माझ्याकडून  कोणती चूक होत नाही आहे ना याकडे अंधुक झालेल्या नजरेतून टक लाऊन आजी पहात होती ... वेळोवेळी आमचे श्वान कोणत्यातरी "परक्या "व्यक्तीच्या आगमनाची वार्ता त्यांच्या पद्धतीने देत होते ... या सगळ्या सवयीच्या वातावरणात अथर्वशीर्षाचे पठण करत मी गणपतीची प्रतिष्ठापना करत होतो .... अचानक घरासमोरील मंडळाचा "डॉल्बी " काही सेकंद सुरु झाला आणि बंद झाला .... पूजा निर्विघ्न होईल या औटघटकेच्या आनंदात मी पुन्हा पूजेत मग्न झालो " नमो व्रातपतये ..नमो गणपतये ..नमो प्रमथपतये  ...... " आणि " चालावो ना नैनो के बाण रे ...... " मी थोडा आवाज वाढवून " नमस्तेस्तु लंबोदरा ......" " जान ले लो ना जान रे ....." यांत्रिक शक्तीसमोर मानवी मर्यादा कमी पडतात याची जाणीव होऊन टाकलेला निराशेचा सुस्कारा आजीच्या कानांनी अचूक टिपला आणि म्हणाली " आता टिळकांचा गणपती नाही राहिला बाबा ..... " ..... टिळक ....टिळक .... कोणता बरे तो दिवस ?? केसरी वाड्यात त्यांचा ध्वनिमुद्रित आवाज ऐकला होता .... आता डॉल्बीचे गाणे बदलले होते " गो गो गो गोविंदा .... " ......तरीही मन पुन्हा केसरी वाड्याकडे धाव घेत होते ... गोंगाटात सुद्धा एक आवाज गर्जत कानावर पडला "..... ज्यांना शांततेत ऐकायचे नाही त्यांनी बाहेर जा " वा....लोकमान्यांचा आवाज ...नशीबवान होती ती पिढी ज्यांनी लोकमान्यांचा आवाज प्रत्यक्ष ऐकला त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव साजरा केला ...नाहीतर आम्ही ....ऐकत आहोत " बदनाम झालेल्या मुन्नीच्या हलकट जवानीला आणि वाट बघणाऱ्या रिक्षावाल्याच्या चिकनी चमेलीला " ....पण गणेशोत्सव ????

Friday 14 September 2012

काकस्पर्ष ..... ( उशिरा पाहिलेली ) अप्रतिम कलाकृती ......


कोण्या एका नदीचा काठ ,संथपणे वाहणारा पाण्याचा प्रवाह , काठावर शांततेत उभे असलेले नातलग, काळ्याठिक्कर कातळाने बनलेल्या घाटाच्या पायरीवर पांढऱ्या शुभ्र भाताचे ठेवलेले पिंड आणि पिंडास अधिकच शुभ्र करणारे दधी ,गती प्राप्त व्हावी म्हणून पिंडापासून काही अंतरावर  अपुऱ्या इच्छा पूर्ण करेन असे आश्वासन देऊन उभा असलेला वारस , काही काळासाठी मंत्रपठण थांबवलेले गुरुजी आणि पिंडाच्या भाताकडे काहीश्या अधाशी नजरेने पाहत थांबलेली  श्वानाची टोळी या सर्वाना एकाचीच प्रतीक्षा असते .... " कावळ्याची " ... आणि पिंडास " काकस्पर्षाची " ....जवळपास सर्व हेच चित्र दिसते  , प्रसंगी दर्भाचा काकही तयार असतो पण   ज्यावेळी आपल्या भावाच्या पिंडास काकस्पर्ष होत नाही म्हणून  दर्भाचा पर्याय उपलब्ध असताना भलतेच आश्वासन देऊन एका काकस्पर्षासाठी एका मुलीचे संपूर्ण आयुष्य पणाला लावत असेल , तिच्या भावना -भविष्य यापेक्षा आपल्या भावाच्या मुक्तीचा अधिक विचार करत असेल ,  आणि मृतात्माही विशिष्ट अश्वसानासाठी अट्टाहास धरत असेल तर पुरुषी मनोवृत्तीतून , कर्मठ विचारसरणीतून , सामाजिक दबावातून आणि एका स्त्री आयुष्याच्या त्यागातून एक हृदयस्पर्शी अप्रतिम कलाकृती उभी राहते ..... " काकस्पर्ष - एक विलक्षण प्रेम कहाणी "

Sunday 9 September 2012

थिल्लर -चिल्लर पार्टी


सिगरेटचा धुरात असे काय असते की ज्याने तरुणाई मोहरते ? मद्याच्या फेसाळत्या प्याल्यात असे काय असते की ज्याचे आकर्षण असते ? कर्कश्य आवाजात लावलेल्या गाण्यात असे काय असते जे नेहमीच्या गाण्यापेक्षा वेगळे असते ? तंग कपडे घालून एकमेकांना खेटून नाचण्यातून असे काय मिळते जे मैत्रीतून मिळत नाही ? सिगारेट ,मद्य , गाणी ,नाच यासारख्या  गोष्टीत नेमके काय असते ज्यामुळे तरुणाई समाज ,संस्कार , नितीमत्ता आणि नियमांच्या चौकटी मोडल्याचा रुबाब मिरवत शेकडोंच्या संख्येने एकत्र येतात आणि समाजासमोर काही गंभीर प्रश्न उपस्थित करतात ?? पुण्यात एका आठवड्यात उघडकीस आलेल्या (२) चिल्लर आणि एका थिल्लर ( मिडिया ने केलेले नामकरण ) पार्टी मुळे सांस्कृतिक पुणे खरच सांस्कृतिक राहिले आहे का ?? हा प्रश्न पुन्हा नव्याने चर्चेस आला आहे ....

Sunday 2 September 2012

पुतना मावशीचे प्रेम ......

दिनांक १०/०८/ २०१२ पासून आपण मराठी चित्रपट सृष्टीचे किती निस्सीम  चाहते आहोत ,मराठी चित्रपटसृष्टीच्या भवितव्याची आणि ऐतिहासिक ठेव्याची आपणास किती काळजी आहे हे दर्शवण्यासाठी लता मंगेशकर यांच्या विरोधात टीकेची झोड उठवून मराठी माणूस कर्तव्यपूर्तीचा आनंद साजरा करत आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने त्यांच्यावर दिवाणी दावा दाखल केला आहे . ज्या "ऐतिहासिक जयप्रभा स्टुडीओ " च्या विक्रीवरून हे रणकंदन चालू आहे त्याचा इतिहास मात्र दुर्लक्षिला जात आहे ...

Saturday 1 September 2012

एका लग्नाची (थोडक्यात संपलेली ) दुसरी गोष्ट


आईक हा शब्द आता कालबाह्य झालाय " लिसन " म्हटल्या शिवाय आता ऐकूच येत नाही ..एखाद्या गोष्टीला उत्तम /छान म्हणायचे असेल तर "बढीया " म्हणल्या शिवाय "कॉम्प्लिमेंट " दिल्या सारखे वाटत नाही ,..आपल्या लगचे /प्रेमाचे किस्से सांगताना "आमच थोड वेगळ आहे " असे - दा बोलल्याशिवाय किस्सा पूर्णच होत नाही , आई -मॉम- ममा यांच्या पंक्तीत "आयडी " हा शब्द मानाने विराजमान झालाय ,प्रेमी युगुलात " बोगनवेल -प्रभूतल्या " इन आहे ,वाहिनीचे "वाहिनुडी " असे नामांतर स्वीकारले गेले आहे ,सतत बौद्धिक देणाऱ्या व्यक्तीस "ज्ञाना " तर कविता करणाऱ्या मुलीस "कुहू " ही नवी टोपण नावे मिळालीत , आता मित्र -मैत्रिणी "पार्टी " करायला जात नाहीत तर "आनंद लुटायला " जातात , लाडक्या व्यक्तीस आता "गब्बू " नावाने हाक मारली जाते...  १६/०१/२०११ या दिवशी सुरु झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेने अवघ्या दीड वर्षात सर्वाना आपलेसे केले आहे ..कॉलेज च्या कट्ट्यावर ,चहा च्या टपरीवर ,फेसबुक च्या वॉल वर ,खेळाच्या ग्राउंड वर ,मिटिंग च्या टेबल वर ,रेल्वे च्या डब्यात आणि एस .टी.च्या गर्दीत अनेकांच्या तोंडी एकच विषय ..." लिसन काल एका लग्नाची मध्ये काय झाले ?" " ज्ञाना सारखा काय बोलतो रे ? " " " घना किती दुष्ट आहे यार " " सगळे पुरुष सारखेच " " मला पण यु .एस .ला जायचं पण माझ्या घरच्यांना पण असेच वाटत असेल काय ?" सर्व आयुष्य आणि चर्चेचे विषय बनलेली "एका लग्नाची दुसरी गोष्ट " आता संपली आहे ....