Sunday 24 February 2013

म ....मिडियाचा म ... मदतीचा

photo courtesy -www.dailymail.co.uk
दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्राला महादुष्काळाने ग्रासले आहे . अनेक वर्षे विदर्भ ,मराठवाडा ,जत ,आटपाडी या दुष्काळी भागातील समस्या सरकारने  सोडवल्याने आज महाराष्ट्र पुन्हा एकदा दुष्काळाशी झुंज द्यायला सज्ज झाला आहे . कोण किती घोटाळे करतो आणि पाण्यातूनही कोण किती पैसा उभा करतो यात जनतेला राग सोडला तर काही देणे घेणे नसते . पदाचा तात्पुरता राजीनामा देऊन किंवा एखादी श्वेत  पत्रिका छापून वावरात पाणी येत नसते .तात्पुरते पाणी जरी पुरवले तरी त्याने शेत भिजत नसते .चाऱ्यासाठी अनुदान देऊन मतांचे अनुदान दरवेळी मिळत नसते .पण या झाल्या सांगायच्या आणि लिहायच्या गोष्टी . दरवेळी कर्जमाफीचे आयुध बाहेर काढले की शेतकरी कायमच्या प्रश्नाला दिलेल्या तात्पुरत्या उत्तराने समाधानी होतो आणि पुढच्या वर्षीच्या दुष्काळाचा पाया रचला जातो . दुष्काळाबद्दल चर्चा सुरु असताना आतापर्यंत कधीही ग्रामीण भागात  पोहोचलेल्या मिडियावर  "महाराष्ट्रातील जनतेसाठी तुमची काही जबाबदारी नाही का ? " , "तुमच्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यात तुम्ही अपयशी ठरला हे मान्य करता का ? " , "महाराष्ट्रातील ८० टक्के जनतेचे मत आहे की सरकार दुष्काळाबद्दल उदासीन आहे " असे संवाद अनेकदा आपण ऐकतो किंवा " आमच्या बातमीचा परिणाम "," अखेर जागे झाले सरकार " अशा ठळक मथळ्याचे लेख वृत्तपत्रात आपण आवडीने वाचतो . मिडिया आपले कर्तव्य खूपच चोखपणे पार पाडत आहे असा आपला समज असतो 

Sunday 10 February 2013

तहाचे राजकारण ......

चित्र सौजन्य -चित्रलेखा 
प्रस्थापित राज्यशक्ती ,राज्यकर्त्यांची प्रतिकूल धोरणे ,समाजात खदखदत असलेला असंतोष ,रुंदावत चाललेली विषमतेची दरी ,आणि जनमानसात असलेली बदलाची अपेक्षा .अशा परिस्थितीत उन्मत्त राज्याशाक्तीला पर्याय ,देणारे राज्यकर्त्यांना भानावर आणणारे , जनमानसाच्या समस्या सोडवणारे एक नेतृत्व आकाराला येते . व्यक्तीपुजेची समृद्ध परंपरा असलेल्या आपल्या देशात भाटाना  पुन्हा सुगीचे दिवस येतात . नेतृत्वाच्या स्तुतीत मश्गुल झालेल्या अनेक पिढ्या नेतृत्वाकडून "तव तेजाचा अंश न मागता " जमीनदारी ,वतनदारी आणि आताच्या जमान्यात सहकार ,टेंडर मागून आपल्या येणाऱ्या पिढ्यांची सोय करून ठेवतात .त्या व्यक्तीचे गुण न घेतल्याने नेतृत्वाच्या पश्चात वारसापुढे प्रश्न उपस्थित होतो कि हे प्रचंड  साम्राज्य सांभाळायचे कसे ? आपल्या लोकांच्या उफाळून आलेल्या महत्वाकांक्षा , संभाव्य बंड , आणि प्रबळ झालेला शत्रू या परिस्थितीत साम्राज्य वाढवणे सोडाच आहे ते सांभाळणे इतकेच हाती राहते . आणि सुरु होते "तहाचे " राजकारण .... हि परंपरा शिवशाही ते शिवसेना व्हाया लोकशाही अखंड सुरूच आहे . म्हणूनच उद्धव यांनी स्वराज स्थापन करण्यासाठी राज यांच्याशी तह केला तर आश्चर्य वाटायचे कारण नाही ...