Monday 30 April 2012

दिन महाराष्ट्र

"दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा " " जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा " " लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे " " सेवेच्या ठाई तत्पर .." " जय जय रघुवीर समर्थ " " ताटी उघडा ज्ञानेश्वरा " "आता विश्वात ..." " राकट देशा...." " खबरदार जर टाच मारुनी याल पुढे चिंधड्या ..." " वेडात दौडले वीर मराठे " " काशिया त्यजू पदाला " पासून "भैरवी " पर्यंत नटलेला ,सजलेला आणि कृतकृत्य झालेला " महाराष्ट्र माझा " सह्याद्रीच्या कड्यांनी वेढलेला , देवगिरी पासून ते रायगडापर्यंत संरक्षणाचा अभेद्य कोट उभा करणारा, शोर्याच्या आणि त्यागाच्या गाथा सांगणारा , वीररसाने तृप्त करणाऱ्या शाहिरी ऐकणारा तर ढोलकीच्या थापेने आणि रमणीच्या नाचाने शृंगाररसात डोलणारा ,ज्ञानेश्वरांपासून ते समर्थ रामदास पर्यंत भक्तीची ,श्रद्धेची आणि उपासनेची शिकवण देणारा , आई महालक्ष्मी आणि तुळजाभवानी यांनी आशीर्वाद दिलेला ,विठोबाच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि देवराष्ट्र म्हणून ख्याती पावलेला , तमाशाच्या फडात आणि कुस्तीच्या आखाड्यात सम तन्मयतेने रमलेला ,देवालांपासून ते गडकरी यांचे पर्यंत आणि दादासाहेब फाळके यांचेपासून मांजरेकरापर्यंत... माडगूळकरांपासून ते खरे पर्यंत ,दर्पण  पासून ते सकाळ /लोकसत्ता पर्यंत , खाशाबा जाधावांपासून ते चंद्रहार पाटला पर्यंत ,दुर्गा खोटे पासून माधुरी दीक्षित पर्यंत , फुले पासून रयत पर्यंत ,रमा रानडे पासून बाबा आमटे पर्यंत ,किर्लोस्करांपासून ते डी.एस .के पर्यंत ,आनंदी जोशींपासून तात्याराव लहाने पर्यंत प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक विभागात अनेक नररत्ने प्रसवून आनंद घेणारा माझा महाराष्ट्र ! प्रत्येकाने हेवा वाटावा असा माझा महाराष्ट्र ! अश्या या माझ्या महाराष्ट्राचा आज निर्मिती दिवस ... प्रत्येक सुखाला एक दुखाची किनार असते ...कितीही प्रयत्न केला तरी तिला नजर अंदाज करता येत नाही ..शुभ दिनी कटू बोलू नये असा प्रघात आहे पण जर पाडव्याला आपण कडू निम्बाचे पान खाऊन समतोल साधतो तर इतर दिवशी तसे का करू नये ? 

Sunday 29 April 2012

राष्ट्रपतींचे अधिकार : किती कामाचे, किती नावापुरते?

राष्ट्रपतींच्या अधिकारांची माहिती घटनेच्या कलम 52 ते 62मध्ये आहे; मात्र त्यांची ‘सद्य:स्थिती’ सांगत आहेत विशेषज्ञ..

सर्वात मोठय़ा पक्षाला सरकार स्थापनेचे आमंत्रण

वस्तुस्थिती : पूर्वीच्या काळी असे होत असे, आता नाही. आता एकेक पक्ष जोडून आघाडी स्थापन करत निवडणुका लढवाव्या लागतात. अशा या आघाडीच्या राजकारणाच्या काळात राष्ट्रपती सर्वात मोठय़ा पक्षाला नव्हे, तर सरकार स्थापनेसाठी आकड्यांचे जुगाड जमवू शकणार्‍या पक्षालाच आमंत्रण देतात.

उदाहरण : 1998च्या निवडणुकांनंतर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र, राष्ट्रपतींनी सरकार स्थापण्याचे निमंत्रण दिले ते भाजपच्या अटलबिहारी वाजपेयींना. कारण, सर्वाधिक खासदारांच्या पाठिंब्याचे पत्र त्यांच्याकडे होते.

Saturday 28 April 2012

"आहे ....सचिन आहे " !!


इतिहासाच्या पुस्तकावरची धूळ झटकली आणि थोडी पाने आठवायचा प्रयत्न केला की शाळेमध्ये कधीतरी नागरिक शास्त्र नावाचा विषय होळी साजरी करत पाठ केल्याचे आठवते ..मी शाळेतील "जोश्या " नसल्याने आणि आमच्या शाळेत कोणी केवडा नसल्याने  अभ्यासात चांगलेच लक्ष होते .. नागरिकशास्त्रात फार काही प्रगती झाली नसली तरी आमदारांची "विधानसभा " खासदारांची  " लोकसभा " आणि विशेष व्यक्तींची "राज्यसभा " असे कधीतरी कोठेतरी वाचल्याचे अंधुक अंधुक आठवते ....डॉक्टर झाल्यावर आणि मुलाचा /मुलीचा अभ्यास घेणे या अपरिहार्य  कारणाच्या मध्यंतरी पुन्हा शाळेची पुस्तके आठवायला लावल्याबद्दल सचिन रमेश तेंडूलकर याचे मनापासून आभार ... १० क्रमांकाच्या जर्सी पासून ते १० जनपथ पर्यंतचा प्रवास पार केल्याबद्दल विशेष कौतुक आणि कॉंग्रेस ने एका चेंडूतच ६ षटकार मारायचा भीमकाय पराक्रम केला याबद्दल त्यांचा सत्कार .... भारत रत्न ला बगल देऊन नवीन काटेरी मुकुट सचिन च्या डोक्यावर घालून त्याचा यथोचित सन्मान केल्या बद्दल मनापासून अभिनंदन ....

Thursday 19 April 2012

देवा तुला शोधू कुठ ??

     उंच कळस त्यावर मानाने फडकणारा भगवा ,सडा-रांगोळी करून तोरणे बांधून पावित्र्य आणलेला परिसर, धुपाचा सुवास,शांतपणे किण किण वाजणारी घंटा,मंत्रांचे -वेदांचे अखंडित पठण, सुरु असलेले होम-यज्ञ ,नैवेद्याची तयारी ,सुवासिनींची लगबग ,विधिवत  होणाऱ्या पूजा ,मनापासून नमस्कार करणारा भक्त ,दक्षिणेकडे डोळा न ठेवता मनापासून आशीर्वाद आणि प्रसाद देणारे गुरुजी ,तुपाच्या समयीच्या मंद तेवणाऱ्या वातीच्या उजेडात दिसणारे  देवाचे लोभस  रूप अन हे पाहून अनुभवून चिंतेच्या आणि काळजीच्या काळोखी सागरावर उमटणारे भक्तीचे ,आशेचे आणि श्रद्धेचे तरंग ....हे सर्व समाधानाने पाहत असणारा भक्तांच्या भक्तीने श्रीमंत झालेला देव !! लहानपणी आजी/आई आपल्या मनाचे समाधान व्हावे म्हणून जे काल्पनिक आटपाट नगर तयार करायच्या त्या नगरातील मंदिर वाटतय न ? जसे आटपाट नगर शोधण्यात सर्व बालपण संपले तसेच या आटपाट नगरातील मंदिर शोधण्यात पुढचे सर्व आयुष्य संपेल काय अशी भीती आताशी वाटू लागली आहे ..देवाचा शोध घेण्य इतकी माझी पात्रता निश्चितच नाही कारण त्यासाठी लागणारे ज्ञान ,इंद्रियांवर लागणारे नियंत्रण, शट चक्रांवर मिळवलेला विजय ,जागृत कुंडलिनी , पाठांतर , षडरीपुंवर मिळवलेला विजय ,निस्सीम उपासना आणि त्याग यासारख्या ज्या  गोष्टी आवश्यक असतात त्या माझ्याजवळ किंवा माझ्या पिढीतील बहुतेक कोणाजवळही नाहीत पण मनास एक प्रश्न नेहमी पडतो कि समज देव असला तर तो कोठे असेल ? जागृत देवस्थानात देव खरच असतो का ? तेथे त्याचा जीव रमतो का ? चालू असलेले सर्व प्रकार त्याला सहन होतात का ? 
 "३३ कोटी रूपे तुझी ३३ कोटी नावे तुझी परी तू अज्ञात ....कोठे असशी तू आकाशी कुठल्या गावी कोठे वसशी कुण्या देवळात ..देवा ..देवा तुला शोधू कुठ ?? " 

Tuesday 10 April 2012

कस काय भांडारकर बर हाय का ? काल काय ऐकल ते खर हाय का ?


  हिंदी सिनेमा सृष्टी मध्ये काही संवाद असे असतात की ते बोलून नायक /खलनायकांना ,ऐकून अभिनेत्रींना , पाहून प्रेक्षकांना ,दिग्दर्शित करून दिग्दर्शकांना आणि लिहून लेखकांना पाठ झालेले असतात तरीही ते लिहायचा मोह त्यांना आवरत नाही ... कानून के लंबे हात असो किंवा इन्साफ का तराजू ,भगवान के लिये मुझे छोड दो असो वा तुम्हारे घर मै मा- बेहेन नही है क्या असो किंवा कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है असो या रटाळ संवादांचा जेव्हा प्रत्यक्षात उपयोग करायचा म्हंटला तर " हां मेरे घर मै मा -बेहेन है लेकीन तुम्हारे जितनी खुबसुरत नही है अगर तुम्हे ऐसेही छोड दिया तो भगवान भी बुरा मान जायेगा फिकर मत करो जानेमन जिस हात मै इन्साफ का तराजू है वो हात हम जेब मे लेकर घुमा करते है कानून के लंबे हातोंको लेकर तुम क्या दांडिया खेलोगी ? जहा तुम्हे पोहोचना है उस जगह तक यही हात तुम्हे पोहोचा सकते है ....चूप चाप बाहोमे आके ये वक़्त "मधुर "बना दे क्युंकी कुछ  पाने के लिये कुछ खोना तो पडताही है .... " (टाळ्या ? शिट्ट्या ? फेटे ? असो ....) असा संवाद मायानगरीत दाखल झालेल्या कितेक तरुणींना ऐकावे लागत असतील ...प्रस्थापित घराण्याशी संबंध नसलेल्या पण उरी प्रसिद्ध व्हायचे स्वप्न नसलेल्या सुंदर तरुणींना किती कामासक्त नजरेतून पुढे जावे लागत असेल ..इतके करूनही त्यांना संधी मिळते का ? आणि झालेल्या अन्यायाबद्दल वाचा फोडली तर त्यांना न्याय मिळतो का हे दोन्ही प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहेत ....आणि याची उत्तरे नजीकच्या भविष्यात मिळतील अशी शक्यताही नही ...

Sunday 8 April 2012

"पाकिस्तानचे शंभर सैनिक बर्फाखाली गाडले गेले. Great."- माणुसकीचा पराभव !!


तसा ब्लॉग लिहायचा आज काही विचार न्हवता ...रविवार आहे त्यामुळे डोक्याला ताण न देणे असे ठरवून निवांत इंटरनेट वर संचार करायला सुरुवात केली आणि आवडीचे बुक म्हणजे फेस बुक उघडले ... अनेक ग्रौप शी संलग्न असल्याने विविध ग्रौप मधून असंख्य नोटी . वाल  वर झळकत असतात ..त्यातील एका नोटी ने लक्ष  वेधून घेतले आणि डोक्याकडून हाताकडे प्रतिक्षिप्त क्रिया आली म्हणून ब्लॉग  लिहायला घेतला ... सध्या अनेक ठिकाणी आणि अनेक ग्रौप वर कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते जहाल आणि विचारांना भरकटायला लावणारी किंवा विचार किती भरकटलेले आहेत हे दर्शवणारी बेछुट व्यक्तव्ये करत असताना दिसतात .... काही लोक तर हिंदू धर्म सोडून  इतरही धर्म  या जगात आहेत  हे मानायलाही तयार होत नाहीत आणि त्यांना समजवायला गेले किंवा सर्वधर्म समभाव असे काही बोलले कि एकतर तू हिंदू नाहीस  असा सरळ , तुझे खाते खोटे आहे असा शंकेखोर आणि सुंता कधी करून घेतो आहेस असा चीड आणणारा प्रश्न समोर उभा केला जातो .. विनाकारण लोकांच्या भावना भडकावणे , एका ठराविक धर्माला निशाणा बनवणे आणि त्यांच्यावर काहीही बोलून  आपण किती कट्टर हिंदुत्ववादी आहोत हे सिद्ध करणे याचा नवा प्रवाह आता रुजू होताना दिसत आहे ...असाच एक कार्यकर्ता "पाकिस्तानचे शंभर सैनिक बर्फाखाली गाडले गेले. Great." अशी पोस्ट सर्व ठिकाणी टाकतो तेव्हा हिंदू धर्माचा , 
धर्मातील शिकवणीचा , हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा , त्यांच्या विचारांचा प्रवास नक्की कोणत्या दिशेने 
चालू आहे असा प्रश्न एका "मानवतेचा धर्म " मानणाऱ्या माणसास पडतो आणि मनास वेदना देऊन जातो ....

Saturday 7 April 2012

घईंची ची घाई....

 सुभाष घई नावाचा एक लाकुडतोड्या होता ...सिमेंट च्या पंचतारांकित जंगलात राहणारा ,बाटलीतील शुद्ध पाणी पिणारा ,ए.सी .च्या निर्मळ हवेत राहणारा ,रणरणत्या उन्हात विदेशी गाडीतून फिरणारा ,सप्त तारांकित हॉटेल मधील अन्न गोड मानून खाणारा ,सौंदर्याच्या जंगलात जाऊन लोकांचे खिसे कापून ओबड धोबड लाकडे घेऊन येणारा आणि आपल्या कार्यशाळेत त्यांच्यावर पैलू पडून अप्रतिम कलाकृती निर्माण करणारा ..कार्यशाळेत तयार होणाऱ्या कलाकृतींना भलताच भाव मिळू लागला ,कार्यशाळा प्रसिद्धीच्या लाटेवर डोलू लागली ,लाकुडतोड्याच्या घरी पैशाचा पाऊस पडू लागला मग लाकुडतोड्या आपली कुऱ्हाड रुप्याची करायच्या आणि कार्यक्षेत्र विस्तारायच्या तयारीला लागला ....बिचारा अनेक वर्षे कोटीच्या कोटी रुपये घेऊन सरकारदरबारी खेटे घालू लागला आणि हजारोंच्या वाहणा झिजवू लागला ...आलेला घाम टिशू ने पुसू लागला ...अखेर एके दिवशी त्याच्या मेहेनतीला विलासी स्पर्श लागला आणि त्याचे स्वप्न पूर्ण झाले ...हा झाला कथेचा पूर्वार्ध ..१० वर्षाच्या मध्यंतरा नंतर आता उत्तरार्ध सुरु झालाय ...संमती देणारा राजा दिल्ली मध्ये गेला ,सोन्याचे मुग खाऊन  शांत बसलेल्या मंत्रिमंडळाची फेर रचना झाली ,जमिनीत पुरून ठेवलेल्या कायदा आणि नियम याची अचानक काही लोकांना आठवण झाली आणि अखेर लोकशाही ला जाग आली ..कानून के लंबे हात लाकूडतोडे के गिरेबान तक पोहोच गये ..अखेर घईंची घाई त्यांना नडली ....