माझ्या छोटेखानी आयुष्याचा विचार करताना अनेकदा मला असे वाटते कि मी १०-२० वर्षे आधी जन्माला यायला हवा होतो ...आज तर हे प्रकर्षाने जाणवत आहे . मी बाळासाहेब पहिले ते नारायण राणे आणि छगन भुजबळ यांच्या पक्षत्यागा नंतर खचलेले , वार्धक्याकडे झुकलेले आणि राज यांनी मातोश्री सोडल्याचे दुक्ख सहन करत असलेले बाळासाहेब .. ! अनेकदा त्यांच्या भाषणात आणि लेखनात मी "घराणेशाही लादली नाही " हा गाभा आणि त्या अनुशंघाने ठाकरी टोलेबाजी ऐकायला मिळाली .परंतु बाळासाहेब ज्या हिंदुत्ववादी विचारांसाठी आग्रही होते ते विचार त्यांच्याच समृद्ध वक्तृत्वातून क्वचितच ऐकायला मिळाले . माझी आजी म्हणजे बाळासाहेबांची कट्टर समर्थक ... इतर वेळी राखून ठेवलेला आवाज बाळासाहेब यांच्याविषयी बोलताना कसा स्पष्ट आणि धारधार होतो हे आजही मला न उलगडलेले कोडे आहे . बाळासाहेबांनी "माता आणि भगिनी " यांच्या मनात आपल्याविषयी इतका आदर निर्माण केला आहे कि जेव्हा मी निबंध -वक्तृत्व स्पर्धा जिंकून आजीला नमस्कार करायला जातो तेव्हा ती हमखास म्हणते "लिहायचे किंवा बोलायचे असेल तर ठाकरे सारखे बोल ...काय आवाज ,काय नजर ,काय अभ्यास .... " त्यामुळे लहानपणापासून ठाकरे या नावाचे वलय आणि संस्कार मनावर झालेत . म्हणूनच कायम खंत वाटते कि मी बालासाहेबना "मराठी मुद्दा ,मराठी माणसाचा प्रश्न ,मराठी पाट्या इत्यादी सर्वप्रथम मी उपस्थित केला " असे म्हणताना ऐकले आहे पण तो प्रश्न त्यांनी जेव्हा उपस्थित केला तेव्हा मी न्हवतो .... दुर्दैवाने आमच्या पिढीला चांगले राजकीय वक्ते अनुभायालाच मिळाले नाहीत . सभेची मैदाने "भरवणे " आणि सभेची मैदाने "भरणे " यातील अंतर ते काय आमच्या पिढीस ठाऊकच नाही . म्हणूनच मला नेहमी वाटते घड्याळ उलटे फिरवावे आणि १०-२० वर्षे मागे जावे ...बाळासाहेबांचे विचार त्यांची आक्रमकता ,ठाकरी शैली आणि टीकेत असणारी आग पहिल्या रांगेत बसून ऐकावी ,अनुभवावी .
सुलभा : पुरुषा राजन सततं प्रियवादिन :! अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ:!!
Saturday 17 November 2012
बाळासाहेब ..पुनरागमनाय च !!
माझ्या छोटेखानी आयुष्याचा विचार करताना अनेकदा मला असे वाटते कि मी १०-२० वर्षे आधी जन्माला यायला हवा होतो ...आज तर हे प्रकर्षाने जाणवत आहे . मी बाळासाहेब पहिले ते नारायण राणे आणि छगन भुजबळ यांच्या पक्षत्यागा नंतर खचलेले , वार्धक्याकडे झुकलेले आणि राज यांनी मातोश्री सोडल्याचे दुक्ख सहन करत असलेले बाळासाहेब .. ! अनेकदा त्यांच्या भाषणात आणि लेखनात मी "घराणेशाही लादली नाही " हा गाभा आणि त्या अनुशंघाने ठाकरी टोलेबाजी ऐकायला मिळाली .परंतु बाळासाहेब ज्या हिंदुत्ववादी विचारांसाठी आग्रही होते ते विचार त्यांच्याच समृद्ध वक्तृत्वातून क्वचितच ऐकायला मिळाले . माझी आजी म्हणजे बाळासाहेबांची कट्टर समर्थक ... इतर वेळी राखून ठेवलेला आवाज बाळासाहेब यांच्याविषयी बोलताना कसा स्पष्ट आणि धारधार होतो हे आजही मला न उलगडलेले कोडे आहे . बाळासाहेबांनी "माता आणि भगिनी " यांच्या मनात आपल्याविषयी इतका आदर निर्माण केला आहे कि जेव्हा मी निबंध -वक्तृत्व स्पर्धा जिंकून आजीला नमस्कार करायला जातो तेव्हा ती हमखास म्हणते "लिहायचे किंवा बोलायचे असेल तर ठाकरे सारखे बोल ...काय आवाज ,काय नजर ,काय अभ्यास .... " त्यामुळे लहानपणापासून ठाकरे या नावाचे वलय आणि संस्कार मनावर झालेत . म्हणूनच कायम खंत वाटते कि मी बालासाहेबना "मराठी मुद्दा ,मराठी माणसाचा प्रश्न ,मराठी पाट्या इत्यादी सर्वप्रथम मी उपस्थित केला " असे म्हणताना ऐकले आहे पण तो प्रश्न त्यांनी जेव्हा उपस्थित केला तेव्हा मी न्हवतो .... दुर्दैवाने आमच्या पिढीला चांगले राजकीय वक्ते अनुभायालाच मिळाले नाहीत . सभेची मैदाने "भरवणे " आणि सभेची मैदाने "भरणे " यातील अंतर ते काय आमच्या पिढीस ठाऊकच नाही . म्हणूनच मला नेहमी वाटते घड्याळ उलटे फिरवावे आणि १०-२० वर्षे मागे जावे ...बाळासाहेबांचे विचार त्यांची आक्रमकता ,ठाकरी शैली आणि टीकेत असणारी आग पहिल्या रांगेत बसून ऐकावी ,अनुभवावी .
Subscribe to:
Post Comments (Atom)
Mitra.. agadi todalas.. dolyatun pani ananara lekh ahe.. thanks.. RIP Balasaheb.. Maharashtra porkha zala ahe aaj..
ReplyDelete