बालपण हे माणसाच्या आयुष्याला पडलेले एक सुंदर स्वप्न असते
....स्वप्न अशासाठी कि एकदा पडलेले सुंदर स्वप्न पुन्हा पडत नाही आणि पडलेच तरी मूळ
स्वप्नातील गोडवा त्यात असत नाही....आईच्या कुशीत झोपावे ,आजीच्या मांडीवर लोळावे
,बाबांच्या खांद्यावर बसून डोलावे,आजोबाना घोडा करून खेळावे , ताईचे बोट धरून चालावे
आणि दादाला चीड्वावे...कितीही खावे ,कितीही झोपावे ,वाटला तर अभ्यास करावा नाही वाटला
तर पोटात दुखतंय म्हणून नाटक करावे ,मित्रांच्या सोबत हुंदडावे ,फुलपाखराच्या मागे
बागडावे ,भूभूच्या किंवा मनीच्या पिल्ला सोबत खेळताना तासनतास रमावं ,चांदोबा किंवा
चंपक वाचत बसाव आणि चिऊ काऊ च्या गोष्टी ऐकत हसावं..घरातल्या कोणत्या तरी कोपऱ्यात
फतकुल मारून बसाव आणि आजूबाजूच्या भिंती सह एखाद चित्र रंगवाव , २ घास खाण्यासाठी आईला
२ तास घरभर पळवाव ,भीत भीतच बाबांकडे काहीतरी मागाव ..मिळालं तर हरकून जाव आणि श्रीमुखात
मिळाली तर १/२ -१ तास रड झाल कि पुन्हा बाबांच्या मिठीत शिराव, कोणीही भेटला तरी त्याच्याकडे
निरागसपणे पहाव आणि काका ,मामा काहीतरी जोडून आपलंसं कराव ,बोबड्या आवाजात एखाद बालगीत
म्हणून आई बाबांच्या डोळ्यात माया पहावी तर अडखळत रामरक्षा म्हणून आजी आजोबांकडून खाऊ
घ्यावा ....खरच अस बालपण आयुष्यात आणखी एकदा मिळाव !!
किती निरागस होत आपलं बालपण.....आता कामावरून घर आणि घरातून कामावर जायची इतकी
गडबड असते तेव्हा शाळा सुटली कि आईच्या मिठीत शिरायची गडबड असायची...गोष्टी मधला राजकुमार/
राजकुमारी मेली कि भोकाड पसरायचो आपण ....दुक्ख ,जन्म .मृत्यू ,वेदना याच्या परिभाषाच
माहित नसायच्या आपल्याला..एखादा किडा मारला तरी पाप केल्यासारखे वाटायचे ..आपण जे बालपण
अनुभवले त्याहून रम्य आणि सुंदर बालपण आपल्या संततीला मिळावे म्हणून प्रत्येक जण कष्ट
करत असतो.... इतके मोठे आणि कर्तुत्ववान झाल्यावर
आपल्याला आपल्या आई वडिलांची खरी किंमत समजते आणि "थकलेल्या बाबाची गोष्ट
" डोळ्याच्या कडा ओलावून जाते ....असाच एक बाबा ,आपल्या मुलाच्या रम्य बालपणाची
,सुंदर तारुण्याची आणि उज्वल भविष्याची स्वप्ने पाहत असताना जेव्हा कानावर लहान मुलाच्या
"आत्महत्या " ची बातमी कानावर येते तेव्हा त्याचे काय झाले असेल ? ११ वर्षाचे
कोवळे पोर ...सातवी मध्ये शिकणारे...कितीसे मोठे ? अशा मुलाला "आत्म" म्हणजे
काय आणि "हत्या " म्हणजे काय हे तरी माहित असणे शक्य आहे का ? पण त्याने
केली....त्याने आत्महत्या केली ...स्वताचे बालपण स्वताच्या हाताने संपवले ,स्वताचे
आयुष्य ,आई वडिलांनी पाहिलेली स्वप्ने सर्वकाही क्षणार्धात संपवले .....बाबांच्या एका
नकारासाठी.....फ़क़्त एका मोबाइल साठी !!


मी हा लेख वाचला .. अप्रतिम विचार आहे.. आजकालच्या (विशेषतः आय.टी. कंपन्यांमधल्या) पालकांनी हा लेख जरूर वाचावा...!!
ReplyDelete