हिंदुस्तानावर मोघलांनी अनेक शतके राज्य केले ....मोघालांचे क्रौर्य ,द्वेषाचे राजकारण ,धर्मांधता ,मूर्ती भंजनक वृत्ती ,पाशवी प्रवृत्ती आणि रणांगणावर तळपणारी शमशेर या सर्वात "चिकाच्या पडद्याला " अनन्य साधारण महत्व होते ....समोर जरी आलमगीर ,जहापना, बादशाह बसलेला असायचा तरी त्याचे बहुतांश निर्णय आणि आखणी हि चिकाच्या पडद्या आडून व्हायची .... अगदी महसुलापासून ते युद्धापर्यंत सर्व निर्णय या चिकाच्या पडद्या आडून व्हायचे ...त्यास नकार देण्याची कोणाचीही प्राज्ञा /वकूब नसायचा ....या पडद्या आड एक आक्रस्ताळी ,आत्मकेंद्री ,स्वार्थी ,शीघ्रकोपी ,उन्मत्त ,घमेंडी ,हलक्या कानाची ,पोकळ बुद्धीची ,कावेबाज ,जबरदस्त उपद्रवमूल्य असलेली बेगम बसून सर्व साम्राज्य आपल्या नजरेच्या आणि इशाऱ्याच्या धाकावर चालवायची ... कालांतराने मोघल गेले ....इंग्रज आले .... इंग्रज गेले ....काळे इंग्रज आले .... लोकशाही कि काय नवीन शाही उदयास आली ... इंदिरा गांधी यांनी लोकशाहीत मोघल तत्वे जपायचा मनापासून प्रयत्न केला ....परंतु त्यांचे दुर्दैवी देहावसान झाल्याने लोकशाहीत मोघली तत्वे असणारी जागा रिकामीच राहिली ...ती आता भरून निघाली असे वाटत आहे ... देल्ही आणि रायटर्स बिल्डींग यामध्ये पुन्हा चिकाचा पडदा बांधला आहे कि काय आणि १०० वर्षानंतर देशाची राजधानी पुन्हा कोलकाता कडे सरकत आहे कि काय असा प्रश्न सर्वांनाच पडू लागलेला आहे ... फ़क़्त काळानुसार फरक इतकाच पडला आहे कि आता चिकाचा पडदा गळून पडला आहे ..आणि हि बाई आपला आक्रस्ताळीपणा, घमेंडी स्वभाव , अल्पमती ,स्वल्प ज्ञान , स्वार्थी राजकारण याचे प्रत्यंतर सर्वांपुढे कशाची खंत न वाटता देत आहे ...आणि आपला अहं सुखाऊन घेत आहे ...
३७ वर्षानंतर कम्युनिस्ट राजवटीत कधी मारत तर कधी मार खात ,दंगा करत ,झगडत अखेर बंगालच्या खर्या समुद्रात कॉंग्रेस चे तृण या बाईने लावले ... पण सरकारला दाती तृण धरून यायला भाग पडणाऱ्या या तृणाचा पुढे जाऊन निवडुंग होईल असे कोणाशी वाटले न्हवते ... आत्मकेंद्री व्यक्तीचा एक सर्वात मोठा अवगुण असतो तो म्हणजे स्वतःच्या नजरेतून जग पाहणे आणि सर्व जग असेच आहे असा निष्कर्ष काढून सर्वांनी तो मान्य करावा अशी सक्ती करणे ... ममता यांनी सत्ता हाती घेतल्यापासून आणि कॉंग्रेस च्या सत्तेस २५ सदस्यांचा "टेकू " लावल्यापासून आपण कोठेही ,कधीही ,कसेही बोलण्यास असून या देशात सर्व गोष्टींचे ज्ञान फ़क़्त मलाच आहे त्यामुळे मीपात्र असून जो निर्णय घेईन तो सर्वांनी मान्य केलाच पाहिजे असा अट्टाहास धरत त्यांचे राजकारण चालूच आहे ... ज्या सिंगूर प्रकरणावरून दंगा करत सत्ता हस्तगत केली तो कायदा न्यायालयाने अवैध ठरवत सरकारची जनतेवरील ममता बेगडी असल्याचे स्पष्ट केलेच आहे ... तेथील जनता सुधा धड प्रकल्प नाही ,रोजगार नाही आणि अजून जमीनही हातात नाही अशा विवंचनेत अडकली आहे ..आणि इतके असून बोलायची सोय नाही ... संपूर्ण हुकुमशाह कसा सवा याचा वस्तुपाठ ममता यांनी घालून दिलेला आहे ..सरकारी ग्रंथालयात /कार्यालयात सर्व इंग्रजी व काही बंगालीवृत्तापत्रांवर बंदी घालून आपण किती वैचारिक दृष्ट्या मागास आहोत हे दाखवून दिले आहे , बंगाली रुग्णालयात लागलेल्या आगीवर काहीही शोक व्यक्त ना करता बंगालची प्रतिमा खराब करण्यासाठी हे घडवून आणले आहे अशी निष्टुर प्रतिक्रिया व्यक्त करून आपल्या ममतेचा अंदाज सर्वाना दिला आहे , अनेक वर्षे स्थगित असलेला ५१,००० बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा आपल्या आक्रस्ताळी पणाने आणखी प्रलंबित ठेवण्यास यश मिळवले आहे , इतिहासाच्या पुस्तकातून कार्ल मार्क्स यांचे नाव/पाठ काढून सामाजिक जाणीवेच्या शून्यतेचे दर्शन दिले आहे , कामुनिस्त कार्यकर्त्यांच्या घरी जाऊ नका ,त्यांना भेटू नका ,त्यांचेसोबत चहा घेऊ नका ,त्यांच्या मुली करून घेऊ नका किंवा त्यांच्या घरी मुली देऊ नका असा फतवा काढत द्वेषभावना पेरली आहे , अम्बिकेश मोहपात्रा यांना व्यंगचित्रावरून स्त्रीचा अपमान व बदनामी कलमा अंतर्गत अटक करून हुकुमी प्रवृत्तीचे दर्शन दिले आहे , नोनादांगा येथील गरीब वस्ती हटवण्यास विरोध करणाऱ्या जागतिक ख्यातीच्या शास्त्रज्ञ पार्थो सारथी यांना अटक करून खुजेपणाचे दर्शन दिले आहे , मागील सरकारने घेतलेले कर्जाचा हप्ता २२ हजार कोटी असून राज्याचे उत्पन्न २१ हजार कोटी आहे त्यामुळे ३ वर्ष कर्ज व व्याजमाफी करावी असा दबाव सरकारवर टाकून तसेच त्रिवेदी यांच्या राजीनाम्याने आपण किती अर्थशून्य आहोत याचे प्रात्यक्षिक दाखवले आहे ,दमयंती सेन या कर्तुत्ववान महिला पोलिसास केवळ आपले म्हणणे खोटे ठरवले म्हणून खरडपट्टी करून बदली करून सत्तेचा माज दाखवला आहे ..तर राष्टपती पदासाठी घातलेला गोंधळ पाहून बंगाली अस्मितेस तडा दिलेला आहे ... बंगाली जनतेने इसापनीती मधील राजा माशी मारायला माकडाची नियुक्ती करतो तशी नियुक्ती केली आहे असे म्हणायला काही हरकत नाही ....
आपण जसे आहोत तसाच समाज असला पाहिजे या स्वप्नरंजनात माणूस दंग झालेला असतो ...जालातल्या माशाला वाटते हे जग जलमय आहे ,विकारी राजाला वाटते हे जग विकारी आहे ..प्रत्येकजण आपल्याभोवती एक कोश तयार करत असतो आणि त्या कोशाकडून जगाकडे पाहत असतो ..शेवटचा माणूस कसा जगतो याची त्यांना कोणतीही जाण नसते तमा नसते ....आणि हेच जेव्हा राज्यकर्त्या व्यक्तीबाबत घडते तेव्हा परिवर्तनाची नितांत आवश्यकता असते कारण राजा बिघडला तर प्रजा बिघडायला वेळ लागत नाही .... याची जाण जनतेस यायला बहुत काळ लोटेल ... ममता चे वागणे असेच चालू राहील .... कदाचित मायावती आणि मुलायम यांनी पाठींबा दिला तर कॉंग्रेस ला ममता ची गरज भासणार नाही ... ती आपला बंगाल पकडून अधून मधून ओरडत राज्यकारभार करेल ...काही वर्षांनी कंटाळून दरोडेखोरापेक्षा भुरटा चोर या न्यायाने जनता तिला घरी बसवतील ... टाइम मासिकास बरा आपण हिची दाखल घेतली याची खंत वाटेल ....हिलरी बाईना आपण कोणासमोर डोके आपटले याचा पश्चाताप होईल ... पण भारतीय राजकारणाच्या पटलावर उदयास आलेल्या या मोघल दीदी ला निदान आपली पिढी तरी विसरूच शकणार नाही .....
No comments:
Post a Comment