अभिव्यक्ती
म्हणजे काय ? अभिजात म्हणजे
काय ? या दोन
प्रश्नांची उत्तरे ज्यांना हवी
असतील त्यांनी मातीचा
किल्ला पहावा . किल्ला हे माणसाला
समृद्ध करणारे , त्याच्या निरीक्षण
आणि आकलन शक्तीला
वास्तवात उतरवणारे , , वास्तवाहून चार पावले
पुढे जाऊन विचार
करणारे ,कल्पनेला सत्यतेच्या कोंदणात
बसवणारे , येणाऱ्या अनेक पिढ्यांना
प्रेरणा देणारे , खर्ची पडलेल्या
अनेक पिढ्यांच्या कर्तुत्वाची
गाथा सांगणारे शिल्प
असते . मग तो
सह्याद्रीच्या निबिड अरण्यात ,घनदाट
जंगलात वर आलेल्या
कातळावर घडवलेला अभेद्य गड
असो किंवा परसात
केलेला काही फुटी
मातीचा किल्ला असो , आकार
बदलला तरी भाव
बदलत नाही . मातीचा
किल्ला करणे म्हणजे
आपलंच असं स्वराज्य
निर्माण करण्याची एक प्रक्रिया
असते . राजेपण जरी शिवाजीचे
असले तरी त्यास
ते मिळवण्यास सहाय्य
कण्याची एक समृद्ध
धडपड असते . हि
धडपड गेली साडे
तीनशे चारशे वर्ष
अखंड सुरु आहे
. सह्याद्रीच्या कातळात आणि शहराच्या
सिमेंटात अजूनही शिवरायांचे स्मरण
होते . . पूजा होते
. . साधना होते . . राजेंनी
पुन्हा जन्म घ्यावा
म्हणून प्रार्थना होते . ही
'परंपरा ' अनेक पिढ्यांपासून
सुरु आहे . याच
परंपरेतला एक अविभाज्य
भाग म्हणजे दिवाळीत
घडवला जाणारा 'मातीचा
किल्ला ' . . .
केवळ दगडांचे
दगडावर थर रचून
आणि त्यावर माती
लाऊन किल्ला तयार
होत नाही . काहीतरी
आकार निश्चित तयार
होतो पण तो
सार्थकी लागत नाही
. हे सार्थकी लागणं
किल्ल्याच्या बाबतीत अत्यंत महत्वाचे असते . कधी
रायगडला जा , पावनखिंडीत
जा , गेला बाजार
शानिवारावर जा . . आयुष्याचे सार्थक
झाल्या सारखे वाटते . तिकडील
प्रत्येक भिंत , माती , राहिलेले
अवशेष एक वेगळाच
इतिहास सांगतात . आपण 'योग्य
' गोष्टीसाठी वापरले गेल्याने आयुष्याचे
'सार्थक ' झाल्याचा अभिमान बाळगतात
. मिरवतात . आपणही मग मुठभर
माती हातात घेऊन
कपाळाला लाऊन घेतो
. आपल्यासाठी आपल्याच लोकांनी आपल्याच
परक्या सारख्या लोकांचे सांडलेले
रक्त त्या मातीत
हुडकायचा प्रयत्न करतो . हिंदवी
स्वराज्य डोळ्यात सामाऊन घेण्याचा
केविलवाणा प्रयत्न करतो . असा
वारसा असलेला किल्ला
' करून टाकला ' या सदरात
कधीही मोडत नाही
. किल्ला रचण्या सोबत तो
घडवायचा सुद्धा असतो . प्रतिकृती
बनवण्याचे काम तुलनेने
सोपे असते . विविध
कोनातून काढलेले फोटो डोळ्यासमोर
ठेवले आणि त्यास
कष्टाची जोड दिली
की प्रती किल्ला बनून जातो
. कल्पनेतल्या किल्ल्याला वास्तवात आकृती देणे
हे मात्र श्रमाचे
काम असते . कारण
इथे समोर केवळ
दगडे ,विटा ,माती
असते अन त्यातून
आपल्याला काय घडवायचे
आहे त्याचे मनात
चित्र तयार असते
. . मातीत अंकुरु पाहणाऱ्या अभिव्यक्तीचे
, अभिजाततेचे , सर्जनशीलतेचे ते बीज
असते . . राजेंनी जरी साडे
तीनशे किल्ले बनवले
असले तरी त्यांच्या
बाळगोपाळ मावळ्यांनी लाखो किल्ले
घडवले आहेत . . इटुकले
पिटुकले , सहज भेदता
येतील असे , अनुकूल
भौगोलिक जागेवर अन परिस्थितीत
बनवलेले त्यास साडे तीनशे
किल्ल्यांचे महत्व एका दृष्टीने
नाही . पण . . . . रस्त्या रस्त्यावर
, गल्लो गल्लीत , घरा घरात
, गावा गावात , मना मनात
शिवशाही रुजवण्याचे सामर्थ्य मात्र
निश्चितच आहे . . .
या किल्ला
करायच्या पद्धतीत आता बराचसा
फरक पडला आहे
. मी एकदम लहान
असताना उभी दगडे
रचून , आडव्या फरशा घालून
त्यावर चिखलाचे थर चढवून
किल्ला बनवायचो . मी थोडा
मोठा झाल्यावर दगड
रचून त्यात आडव्या
काठ्या घालायच्या आणि वरून
मातीत भिजवलेले पोते
घालायचे म्हणजे हवा तसा
आकार मिळवता येतो
, माती कमी लागते
अन वेळ वाचतो
. या दोन पद्धतीने
मी किल्ला केला
. आता तो कसा
करतात मला माहीत
नाही . येता जाता
मी करत असलेल्या
किल्ल्यांच्या निरीक्षणातून एक गोष्ट
जाणवते , किल्ले बनवायची पद्धत
जरी बदलली असली
तरी किल्ला अजून
तसाच आहे . हिरकणी
बुरुज , पायथ्याशी रामदास स्वामी
यांची दोन उभ्या
विटा वर एक
आडवी वीट या
पद्धतीने केलेले मंदिर , गडाच्या
पायथ्याशी शिवाजी महाराज अफजल
खान यांच्यातील युद्धाचा
एक पुतळा , दोन
बुरुज करून त्यावर
ठेवलेल्या तोफा असे
स्वरूप कितेक वर्षे कायम
आहे . त्यात काळानुरूप
नाविन्य येत नाही
. व्यायसायिक किल्ला निर्माते काहींबाही
करतात पण ती मूळ
किल्ल्याची नक्कल
असल्याने त्याची नकळत मूळ
किल्ल्याच्या भव्यतेशी तुलना होते अन
समोरील मातीचा किल्ला खुजा
वाटायला लागतो . अर्थात हवा
तसा इतिहास बदलून
पाहिजे तसा किल्ला
बदला असे माझे
म्हणणे नाही . . .
शिवरायांचे आयुष्य केवळ
किल्ले उभे करणे
आणि जिंकणे यापुरते
मर्यादित नवते . तो केवळ
स्वराज्य निर्मितीतीला एक भाग
होता . अर्थात या किल्ल्यांवरच
स्वराज्य मजबूत उभे राहिले
हा युक्तिवाद सुद्धा
मान्य . शिवरायांचे आयुष्य म्हणजे
एक अभेद्य ,चिरेबंदी
किल्ला होता . त्यातील सर्व
प्रसंग हे त्यांच्या
संस्कारी पण कणखर
मनाचे प्रतिक होते
. हेच प्रसंग निवडून
त्यावर आधारित किल्ले आता
व्हायला हवेत . अगदी स्वराज्याची
रोहीडेश्वर मंदिरात शपथ घेतल्या
पासून ते आगरायेथून
सुटका होई पर्यंत
. तो प्रसंग सामरिक
असो वा मुत्सदिक
त्यांचे सादरीकरण झाले पाहिजे
. नवीन कल्पना आणि संकल्पना
रुजल्या , रुळल्या आणि स्वीकारल्या
पाहिजेत . . परंपरा जपत असताना
कुठेतरी नवीन पायंडे
पाडले पाहिजेत . . शिवाजी
आपल्याला केवळ माझ्या
किल्ल्यान्पुर्ते मर्यादित रहा असे
सांगत नाही तर
त्यांच्या आयुष्यातून प्रेरणा घ्यायला
सांगतो . . तेच प्रेरणादायक
प्रसंग आपण मांडले
पाहिजेत . . . ते किल्ल्या
इतके भव्य दिव्य
नसतील , पसरलेले नसतील पण कधीतरी
आकार आणि विस्तारा पेक्षा आशयाला आणि खोलीला महत्व दिलेच पाहिजे . . बरोबर न ?
रवींद्रनाथ
टागोर म्हणतातच ,
.
त्या
अनोळखी प्रदेशात केव्हातरी
तुझा संदेश आजही दऱ्या
खोऱ्यात गुंजतो आहे
तुझे नेत्र आजही अनागातला
न्याहाळत आहेत
ते स्वप्न काय असेल
?
हे मानवी देहधारी साधुपुरूषा
तुझी तपस्या ,ध्येय ,कार्य
जणू चिरंतनाला आव्हान देत
आहे !! ""
क्रमशः
आधीचे भाग -
मातीचा किल्ला : भाग एक - http://spaandaan.blogspot.in/2013/10/blog-post_31.html
मातीचा किल्ला : भाग दोन - http://spaandaan.blogspot.in/2013/11/blog-post.html
No comments:
Post a Comment