Sunday, 30 September 2012

पेपर नसलेली सकाळ.....



                      सुटीचा दिवस असल्याने घेतलेली मनसोक्त झोप , आळस देत हाती घेतलेला कॉफीचा कप , रेडीओ  वर रोजच वाजणारी पण आज गुणगुणावीशी वाटणारी गाणी , कॉफीचा रिता  कप बाजूला ठेऊन पुन्हा गादीवर लोळण्याचे स्वातंत्र्य , स्वयंपाकघरात चालू असणाऱ्या स्वयंपाकाचा आज काहीतरी वेगळाच आणि हवा हवासा वाटणारा सुवास , कॉलेज च्या आठवणी ताज्या करत मोठ्याने गाणी लाऊन घासलेले दात आणि गाणी गुणगुणत केलेली अंघोळ ....प्रसन्नचित्ताने नाश्त्याचा घेत असलेला उपभोग ...या सगळ्या वातावरणात लक्ष मात्र दाराकडे असते ...मन आतुरतेने एकाची वाट पाहत असते .... सुखी मनसोक्त दिनचर्येत अस्वस्थपणाची जाणीव करून देत असते ...कोण ? कोण तो ? काल सकाळीतर भेटला होता ...मला जेव्हा झोपायला ,गाणे गुणगुणायला ,आस्वाद घेत कॉफी प्यायला , पुन्हा एकदा डुलकी काढायला , गाणी ऐकत अंघोळ करायला वेळ न्हवता तेव्हा त्याच्यासाठी मात्र " विशेष वेळ राखून " ठेवला होता ... आणि आज तो नाही ?? रोज किती गडबडीत पाहतो मी त्याला ...आज जरा निवांत वेळ आहे तर तो नाही ....तो ... आज का आला नाही ?? काय करू काय आज मी ?? येरझाऱ्या घालण्या पलीकडे मी करू तरी काय शकतो .... आज त्याने सुटी घेतली आणि माझ्या सुटीची मजा घालवली .... श्या राव ...पेपर यायला हवा होता आज ...

Friday, 28 September 2012

जरा याद करो कुर्बानी ..

आजचा शुक्रवार कसा बसा ढकलला की शनिवार- रविवार सुट्टी सोमवारी बुट्टी मारली की मंगळवारी पुन्हा गांधी जयंतीची सुट्टी .....सही ..... कल्ला यार सलग ४ दिवस सुट्ट्या ... कूच तो तुफानी करते है यार ... कोठे जायचं ? अलिबाग ? महाबळेश्वर -लोणावळा काय ग १-२ दिवसात होते ..एक काम करू ..गो गोवा .... मी तर ताणून झोपणार बघ ... घरी जाऊन येतो ४ दिवस...परत दिवाळी शिवाय सुट्टी नाही ... थांब बे .. घरी जाऊन काय स्वयपाक करायला शिकणार आहेस का ? हि बघ मुलगी असून हिला काही येत नाही करायला ....ए गप हा .... प्लान करा रे काहीतरी ...राडा करू ४ दिवस .... अशी चर्चा प्रत्येक कॉलेज कट्ट्यावर सध्या ऐकू येत आहे ..कितीसे वय ? १६-२२ या वयात कोणी .... भारताला स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे , त्यासाठी आपण त्याग केला पाहिजे , सरफरोशी की तमन्ना ... मेरा रंग दे बसंती चोला असे कोणी म्हणत असेल ?? त्यासाठी आयुष्याचे समर्पण करत असेल ?? ए काय रे चिकट ..काहीपण फेकतो काय बे ?? उगाच सकाळी सकाळी डोक्याची मंडई  करू नकोस .... शाहीद कपूर ची लफडी आणि शाहीद आफ्रिदीचे रेकॉर्ड तोंडपाठ असलेल्या तरुणाईला "शहीद भगत सिंग " कसा माहित असणार ?? म्हणूनच २७/०९/२०१२ हा भगतसिंग यांचा जन्मदिवस यंदाही  विस्मृतीत  गेला .....

Wednesday, 26 September 2012

वृत्तपत्रविक्रेता - एक दुर्लक्षित " सेलिब्रिटी "

घराचे किंवा ऑफिस चे टेबल ,टपरीवरचा मातकट बाक किंवा पंचतारांकित हॉटेल मधले अलिशान कोच ,रेल्वे चा डबा  किंवा फेरारीची सीट , कॉलेज चा कट्टा  किंवा फेसबुक ची वाल ,फेसाळता मद्याचा प्याला किंवा चहा /कॉफी चा घुटका , देशी तंबाखू चा झटका ते मार्लब्रोचा झुरका ,खेळाचे मैदान ते कलेचे दालन ...अशा भिन्न ठिकाणच्या ,भिन्न आर्थिक सामाजिक चौकटी असणाऱ्या  जागेत एक गोष्ट मात्र समान असते ती म्हणजे "वृत्तपत्र " ...हे वृत्तपत्र मध्यवर्ती ठेऊन सिनेमातील नटीच्या कमी झालेल्या कपड्यापासून ते वाढलेल्या शेअर मार्केट पर्यंत ,ऑलिम्पिक पासून सचिन च्या निवृत्तीपर्यंत ,एखाद्या उत्पादनाच्या यशापासून ते चित्रपटाच्या अपयशापर्यंत, राजकारणातील अर्थकारणापासून ते समाजकारणातील राजकारणापर्यंत ,दुष्काळापासून अतिवृष्टीपर्यंत ,दुध संघाच्या अध्यक्षीय निवडणुकीपासून ते अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत ,गुन्ह्याच्या काळ्या छायेपासून ते कलेच्या दालनापर्यंत अनेक असामान्य व्यक्तींच्या महानतेच्या कामगिरीची आणि सामान्यांच्या महानतेपर्यंतच्या प्रवासाची माहिती लिहिणारे संपादक -उपसंपादक - वार्ताहार आणि ते आवडीने वाचणारा वाचक वर्ग या दोहोंना जोडणारा दुवा म्हणजे " वृत्तपत्र विक्रेता " कायमच दुर्लक्षित राहतो .....

Wednesday, 19 September 2012

बदललेला गणेशोत्सव

वेळ असेल साधारण सकाळी १० ची ...घरात नेहमीपेक्षा जास्ती वेगाने गडबड चालू होती ... मधूनच एखादे भांडे खाली पडत होते त्याचा आवाज शांततेमुळे घरभर घुमत होता ... फोनवरून  गणपती चतुर्थी च्या शुभेच्छा घेण्यात आणि मोदकाच्या सारणात कोणता जिन्नस किती प्रमाणात घालायचा याचे मोफत मार्गदर्शन करण्यात आई व्यस्त होती ....देवाची पूजा करण्यात माझ्याकडून  कोणती चूक होत नाही आहे ना याकडे अंधुक झालेल्या नजरेतून टक लाऊन आजी पहात होती ... वेळोवेळी आमचे श्वान कोणत्यातरी "परक्या "व्यक्तीच्या आगमनाची वार्ता त्यांच्या पद्धतीने देत होते ... या सगळ्या सवयीच्या वातावरणात अथर्वशीर्षाचे पठण करत मी गणपतीची प्रतिष्ठापना करत होतो .... अचानक घरासमोरील मंडळाचा "डॉल्बी " काही सेकंद सुरु झाला आणि बंद झाला .... पूजा निर्विघ्न होईल या औटघटकेच्या आनंदात मी पुन्हा पूजेत मग्न झालो " नमो व्रातपतये ..नमो गणपतये ..नमो प्रमथपतये  ...... " आणि " चालावो ना नैनो के बाण रे ...... " मी थोडा आवाज वाढवून " नमस्तेस्तु लंबोदरा ......" " जान ले लो ना जान रे ....." यांत्रिक शक्तीसमोर मानवी मर्यादा कमी पडतात याची जाणीव होऊन टाकलेला निराशेचा सुस्कारा आजीच्या कानांनी अचूक टिपला आणि म्हणाली " आता टिळकांचा गणपती नाही राहिला बाबा ..... " ..... टिळक ....टिळक .... कोणता बरे तो दिवस ?? केसरी वाड्यात त्यांचा ध्वनिमुद्रित आवाज ऐकला होता .... आता डॉल्बीचे गाणे बदलले होते " गो गो गो गोविंदा .... " ......तरीही मन पुन्हा केसरी वाड्याकडे धाव घेत होते ... गोंगाटात सुद्धा एक आवाज गर्जत कानावर पडला "..... ज्यांना शांततेत ऐकायचे नाही त्यांनी बाहेर जा " वा....लोकमान्यांचा आवाज ...नशीबवान होती ती पिढी ज्यांनी लोकमान्यांचा आवाज प्रत्यक्ष ऐकला त्यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव साजरा केला ...नाहीतर आम्ही ....ऐकत आहोत " बदनाम झालेल्या मुन्नीच्या हलकट जवानीला आणि वाट बघणाऱ्या रिक्षावाल्याच्या चिकनी चमेलीला " ....पण गणेशोत्सव ????

Friday, 14 September 2012

काकस्पर्ष ..... ( उशिरा पाहिलेली ) अप्रतिम कलाकृती ......


कोण्या एका नदीचा काठ ,संथपणे वाहणारा पाण्याचा प्रवाह , काठावर शांततेत उभे असलेले नातलग, काळ्याठिक्कर कातळाने बनलेल्या घाटाच्या पायरीवर पांढऱ्या शुभ्र भाताचे ठेवलेले पिंड आणि पिंडास अधिकच शुभ्र करणारे दधी ,गती प्राप्त व्हावी म्हणून पिंडापासून काही अंतरावर  अपुऱ्या इच्छा पूर्ण करेन असे आश्वासन देऊन उभा असलेला वारस , काही काळासाठी मंत्रपठण थांबवलेले गुरुजी आणि पिंडाच्या भाताकडे काहीश्या अधाशी नजरेने पाहत थांबलेली  श्वानाची टोळी या सर्वाना एकाचीच प्रतीक्षा असते .... " कावळ्याची " ... आणि पिंडास " काकस्पर्षाची " ....जवळपास सर्व हेच चित्र दिसते  , प्रसंगी दर्भाचा काकही तयार असतो पण   ज्यावेळी आपल्या भावाच्या पिंडास काकस्पर्ष होत नाही म्हणून  दर्भाचा पर्याय उपलब्ध असताना भलतेच आश्वासन देऊन एका काकस्पर्षासाठी एका मुलीचे संपूर्ण आयुष्य पणाला लावत असेल , तिच्या भावना -भविष्य यापेक्षा आपल्या भावाच्या मुक्तीचा अधिक विचार करत असेल ,  आणि मृतात्माही विशिष्ट अश्वसानासाठी अट्टाहास धरत असेल तर पुरुषी मनोवृत्तीतून , कर्मठ विचारसरणीतून , सामाजिक दबावातून आणि एका स्त्री आयुष्याच्या त्यागातून एक हृदयस्पर्शी अप्रतिम कलाकृती उभी राहते ..... " काकस्पर्ष - एक विलक्षण प्रेम कहाणी "

Sunday, 9 September 2012

थिल्लर -चिल्लर पार्टी


सिगरेटचा धुरात असे काय असते की ज्याने तरुणाई मोहरते ? मद्याच्या फेसाळत्या प्याल्यात असे काय असते की ज्याचे आकर्षण असते ? कर्कश्य आवाजात लावलेल्या गाण्यात असे काय असते जे नेहमीच्या गाण्यापेक्षा वेगळे असते ? तंग कपडे घालून एकमेकांना खेटून नाचण्यातून असे काय मिळते जे मैत्रीतून मिळत नाही ? सिगारेट ,मद्य , गाणी ,नाच यासारख्या  गोष्टीत नेमके काय असते ज्यामुळे तरुणाई समाज ,संस्कार , नितीमत्ता आणि नियमांच्या चौकटी मोडल्याचा रुबाब मिरवत शेकडोंच्या संख्येने एकत्र येतात आणि समाजासमोर काही गंभीर प्रश्न उपस्थित करतात ?? पुण्यात एका आठवड्यात उघडकीस आलेल्या (२) चिल्लर आणि एका थिल्लर ( मिडिया ने केलेले नामकरण ) पार्टी मुळे सांस्कृतिक पुणे खरच सांस्कृतिक राहिले आहे का ?? हा प्रश्न पुन्हा नव्याने चर्चेस आला आहे ....

Sunday, 2 September 2012

पुतना मावशीचे प्रेम ......

दिनांक १०/०८/ २०१२ पासून आपण मराठी चित्रपट सृष्टीचे किती निस्सीम  चाहते आहोत ,मराठी चित्रपटसृष्टीच्या भवितव्याची आणि ऐतिहासिक ठेव्याची आपणास किती काळजी आहे हे दर्शवण्यासाठी लता मंगेशकर यांच्या विरोधात टीकेची झोड उठवून मराठी माणूस कर्तव्यपूर्तीचा आनंद साजरा करत आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने त्यांच्यावर दिवाणी दावा दाखल केला आहे . ज्या "ऐतिहासिक जयप्रभा स्टुडीओ " च्या विक्रीवरून हे रणकंदन चालू आहे त्याचा इतिहास मात्र दुर्लक्षिला जात आहे ...

Saturday, 1 September 2012

एका लग्नाची (थोडक्यात संपलेली ) दुसरी गोष्ट


आईक हा शब्द आता कालबाह्य झालाय " लिसन " म्हटल्या शिवाय आता ऐकूच येत नाही ..एखाद्या गोष्टीला उत्तम /छान म्हणायचे असेल तर "बढीया " म्हणल्या शिवाय "कॉम्प्लिमेंट " दिल्या सारखे वाटत नाही ,..आपल्या लगचे /प्रेमाचे किस्से सांगताना "आमच थोड वेगळ आहे " असे - दा बोलल्याशिवाय किस्सा पूर्णच होत नाही , आई -मॉम- ममा यांच्या पंक्तीत "आयडी " हा शब्द मानाने विराजमान झालाय ,प्रेमी युगुलात " बोगनवेल -प्रभूतल्या " इन आहे ,वाहिनीचे "वाहिनुडी " असे नामांतर स्वीकारले गेले आहे ,सतत बौद्धिक देणाऱ्या व्यक्तीस "ज्ञाना " तर कविता करणाऱ्या मुलीस "कुहू " ही नवी टोपण नावे मिळालीत , आता मित्र -मैत्रिणी "पार्टी " करायला जात नाहीत तर "आनंद लुटायला " जातात , लाडक्या व्यक्तीस आता "गब्बू " नावाने हाक मारली जाते...  १६/०१/२०११ या दिवशी सुरु झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेने अवघ्या दीड वर्षात सर्वाना आपलेसे केले आहे ..कॉलेज च्या कट्ट्यावर ,चहा च्या टपरीवर ,फेसबुक च्या वॉल वर ,खेळाच्या ग्राउंड वर ,मिटिंग च्या टेबल वर ,रेल्वे च्या डब्यात आणि एस .टी.च्या गर्दीत अनेकांच्या तोंडी एकच विषय ..." लिसन काल एका लग्नाची मध्ये काय झाले ?" " ज्ञाना सारखा काय बोलतो रे ? " " " घना किती दुष्ट आहे यार " " सगळे पुरुष सारखेच " " मला पण यु .एस .ला जायचं पण माझ्या घरच्यांना पण असेच वाटत असेल काय ?" सर्व आयुष्य आणि चर्चेचे विषय बनलेली "एका लग्नाची दुसरी गोष्ट " आता संपली आहे ....